शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जीएमसीत ‘अर्धा’ डोस ठरतंय वादाचे कारण; रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

By अमित महाबळ | Updated: November 6, 2023 19:22 IST

जिल्ह्याभरातील रुग्ण उपचारासाठी जीएमसीच्या ओपीडीत येत असतात. त्यांना डॉक्टर औषधे लिहून देतात, ती रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषध भांडार कक्षातून घ्यावी लागतात.

अमित महाबळ

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना औषध भांडार कक्षातून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपेक्षा अर्धाच डोस मिळत असून, यामुळे कक्षातील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वाद होत आहेत. दरम्यान, गरज असलेल्या आजारांत १५ ते एक महिन्यापर्यंतची संपूर्ण औषधे दिली जात असल्याचा दावा जीएमसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

जिल्ह्याभरातील रुग्ण उपचारासाठी जीएमसीच्या ओपीडीत येत असतात. त्यांना डॉक्टर औषधे लिहून देतात, ती रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषध भांडार कक्षातून घ्यावी लागतात. मात्र डॉक्टर लिहून देतात त्यापेक्षा अर्धीच औषधे दिली जातात म्हणून कक्षातील कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वाद होत आहेत. जीएमसीमध्ये लांबवरून औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना वारंवार जळगावला येण्याचे प्रवास भाडे परवडत नाही. त्यामुळे डॉक्टर जेवढी औषधे लिहून देतील त्याच संख्येत मिळाली पाहिजेत, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. तसेच औषधी भांडार कक्षातील कर्मचारी अनेकदा मोबाईलवर व्यस्त असतात. त्यांच्याकडून लवकर औषधे मिळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, जीएमसीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी मोठे आजार झालेल्या रुग्णांवर भरती करूनच उपचार होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, पॅरालिसीस, मानसिक आजार असलेल्या रुग्णांना १५ दिवस ते एक महिन्याची संपूर्ण औषधे दिली जात आहेत, असे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावmedicineऔषधं