शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ज्ञानोबा, तुकोबांची मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:33 IST

रामदास फुटाणे : मातृभाषा टिकविणे ही साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांची जबाबदारी

विजयकुमार सैतवालजळगाव : ‘आजोबा नाचू लागले....आजी नाचू लागली, शेंबडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली, नातू नाचू लागला....नात नाचू लागली, रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली, अजान मुळाखाली माती खचू लागली, इंद्रायणीच्या डोहात पोथी टोचू लागली...’ अशी मराठीची अवस्था सध्या महाराष्ट्रात होऊ पाहत असल्याने मराठीचा बळी देऊन इंग्रजी घरात येऊ नये, असे स्पष्ट मत हास्य कवी, चित्रपट कथालेखक, दिग्दर्शक, वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केला. या सोबतच कोणत्याही स्थितीत ज्ञानोबा, तुकोबांची ही मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होऊ नये, ही जबाबदारी साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांची असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जळगावातील व.वा. जिल्हा वाचनालयाच्या १४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी फुटाणे हे जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी मराठी भाषा टिकविण्यासह आजची बदलती शिक्षण पद्धती,स्वरुप यासह राजकीय स्थिती यावर टीकाटिप्पणी केली.मराठी सक्ती केली, वटहुकूम कधी काढणारसर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत मराठीची सक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर मुख्यमंत्र्यांनी इयत्ता दहावीपर्यंत मराठी सक्ती केली खरी, मात्र आता शाळा तर सुरू झाल्या आहेत, या बाबतचा वटहुकूम कधी काढणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे तरुणांची मानसिक दुर्बलता वाढली आहे व मातृभाषेकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र हीच मातृभाषा जगण्याचे बळ देते, त्यामुळे ती टिकलीच पाहिजे.मराठीसाठी कसदार निर्मिती हवीहिंदी भाषेचा प्रचार हिंदी विद्यापीठापेक्षा हिंदी चित्रपटांनी अधिक केला. अशाच प्रकारे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे सर्व चित्रपट बंगाली भाषेत होते, तरी प्रत्येक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकले. याला कारण म्हणजे कसदार कलाकृती. मराठीचाही अधिकाधिक प्रचार-प्रसार होण्यासाठी मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी संगीत कसदार असेल तर ते आपसूकच सर्वत्र पोहचेल. अशाच प्रकारे दर्जेदार साहित्य निर्मिती झाल्यास मराठी साहित्याचे वाचकही वाढतील. पुस्तके वाचल्याने निर्णय क्षमता वाढते, त्यामुळे आजच्या तरुणाईला वाचनाची गोडी लावणे गरजेचे असल्याचे फुटाणे यांनी सांगितले.‘सतत घर बदलणाऱ्याला गृहनिर्माण मिळाले....’सध्याच्या राजकारणाविषयी व राज्यकर्त्यांच्या शालेय धोरणाविषयी बोलता-बोलता रामदास फुटाणे यांनी त्यांच्या ‘सुरुवात’ या कवितेतील ‘तज्ज्ञ पाहूनच खातेवाटप महाराष्ट्राला कळाले, सतत घर बदलणाºयाला गृहनिर्माण मिळाले, अनैतिक राजकारणाची ही खरी सुरुवात आहे, उद्याच्या स्फोटाची पेटलेली वात आहे...’ या पंक्ती सांगत त्यातूनच बदलत्या स्थितीचे वर्णन केले.मराठी जोडाक्षराची भीती बाळगणारे इंग्रजी संस्कृतीचे कौतूक करू लागलेसाहित्य, संस्कृतीची मोठी परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातच मराठी जोडाक्षराची भीती बाळगणारे इंग्रजी संस्कृतीचे कौतुक करू लागले आहेत. ही स्थिती म्हणजे ‘जोडाक्षरे टाळा नवा पोरखेळ आहे, देव अधिक इंद्र म्हणा.... महाराष्ट्रावर वेळ आहे, सत्त्याहत्तर नको आता सत्तर अधिक सातचं पुस्तक, इंग्रजांच्या औलादीचं अभ्यासक्रमात मस्तक...’ अशी असल्याचे त्यांनी आपल्या ‘बाल भारती’ या कवितांच्या ओळीतून सांगितले. राज्यकर्त्यांकडून मराठी भाषा टिकणार नाही, ही जबाबदारी साहित्यिक, लेखक, चित्रपट दिग्दर्शकांची असेही ते म्हणाले. इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी भाषा हद्दपार होऊ पाहत असताना राज्यकर्त्यांनी आणलेली संख्या शिकविण्याची पद्धतही चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले.साहित्य संमेलनाच्या निम्म्या अध्यक्षांना कोणी ओळखत नाहीमराठी साहित्य संमेलन झाल्यानंतर मराठी वाचविण्याची भाषा केली जाते. साहित्य संमेलनातच यावर आवाज का उठविला जात नाही, या प्रश्नावर बोलताना फुटाणे म्हणाले की, गेल्या दशकभरातील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पाहिले तर त्यातील निम्म्या अध्यक्षांना कोणी ओळखत नसेल व त्यांचे साहित्यही कोणी वाचले नसेल. ते केवळ नशिबाने अध्यक्ष झाले. पूर्वी महाराष्ट्रात साहित्याचा जो दबदबा होता, तोदेखील आता राहिलेला नाही. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनातून मराठीबाबत आवाजही उठत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव