शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पालकमंत्र्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे, मात्र टीका केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे निकष पुन्हा बदलवावे लागले. यामध्ये कुणीही श्रेय घेत नसून, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या वडिलांसारखे असून, त्यांनी या मुद्द्यावर मी चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती; मात्र त्यांनी टीका केली, असे सांगत खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

गुरुवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर २६ रोजी भाजपच्या होत असलेल्या आंदोलनाबाबत खासदार रक्षा खडसे यांची पत्रकार परिषद ब्राह्मण सभेत पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, केळी पीक विम्याचे निकष हे राज्य शासनाने बदलविले होते; मात्र त्यावेळीही शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांनी केंद्रावर खापर फोडले. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाला माघार घ्यावी लागली व पुन्हा जुने निकष लागू केले. आता सेनेच्या नेत्यांकडून हे जुने निकष पुन्हा राज्य शासनाने आणले, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जेव्हा निकष हटविले जातात तेव्हा केंद्र शासन जबाबदार आणि हेच निकष पुन्हा आणले जातात तेव्हा राज्य शासनाने केले असल्याचे सांगितले जाते; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती असून, हे निकष बदलविण्यासाठी कोणी प्रयत्न केले. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेतले तरी काहीही फायदा नाही, असे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.