शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कृतज्ञता म्हणजे हृदयातील परमेश्वराचे सिंहासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 20:02 IST

आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते.

ठळक मुद्देजीवन विद्या मिशनतर्फे तन, मन, धन कार्यशाळापितृपक्ष म्हणजे आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पुण्यकाल

रावेर, जि.जळगाव : आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी ईश्वरशक्ती असून, प्रत्येक माणसात परमेश्वर दडला आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते.म्हणून सर्वांची अर्थात समाजातील प्रत्येक घटकाची कृतज्ञता मानून समाधानाची कास धरल्यास खरा विकास होतो. किंबहुना पुण्य हेच समाधान असून, पुण्याईतूनच मन:शांती लाभत असल्याने खरी पुण्याई प्राप्त होत असते. म्हणून कृतज्ञता हेच खरे हृदयातील परमेश्वराचे सिंहासन असल्याचे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे नामधारक दशरथ शिरसाठ यांनी व्यक्त केले.येथील शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित जीवन विद्या मिशनतर्फे आयोजित तन-मन-धन या कार्यशाळेत ते बोलत होते.प्रारंभी, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष सावंत, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, जळगाव शाखेच्या अध्यक्षा कुंदा नारखेडे, जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक बी.एस.पाटील, कृष्णा म्हसकर व दशरथ शिरसाठ यांच्या हस्ते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वालन करण्यात आले.प्रारंभी, कृष्णा म्हसकर यांनी ‘तन’ या विषयावर बोलताना निसर्गाने बनवलेली ही एक पद्धतशीर व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, तन-मन-धन हा त्रिकोण एकमेकांना पूरक आहे. तन व मन निसर्गाने दिलेले भांडवल आहे. त्यांच्या बळावर धन संपादन करावयाचे असते. लहानपणापासून तू भरपूर मोठा हो, अशी जी अपेक्षा व्यक्त करतो ती त्याच अर्थाने करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामकृष्ण परमहंस यांना पैशाची अ‍ॅलर्जी होती. आता मात्र एनर्जी वाटत असल्याची खंत व्यक्त करून सुधीर फडके यांच्या ‘दाम करी काम रे..’ या गाण्याच्या पंक्ती त्यांनी म्हणून सादर केले.पैसा किती व कसा आहे? पैशासाठी जीवन आहे की जीवनासाठी पैसा आहे? हे अंतर्मुख करणारे प्रश्न असून, धन म्हणजे पैसा, संपत्ती व मुलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त पैशाने माणूस सुखी होतो का? तर नाही. गडगंज पैसा असताना स्वास्थ्य नसल्याचे आपण पाहतो. जीवनात सुख सोयी असेल तर आत्मशांती लाभते. म्हणून सोयी सुविधा किती असाव्यात? किती सोयी सुविधा मिळवायचे? याबाबत माणसाचे विचार करण्याची गरज असून, सोयीसुविधा अधिकाधिक न मिळवता त्याचा आनंद उपभोगता येईल. एवढ्या सोयी सुविधा असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.विश्वस्त संतोष सावंत यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक बी.एस.पाटील, जे.आर.पाटील, मोरगाव येथील उद्योजक आर.एस. पाटील, अमोल महाजन, रमेश महाजन, प्रवीण पाटील, जळगाव शाखेच्या अध्यक्षा कुंदा नारखेडे, पंढरीनाथ वानखेडे, सचिव, खजिनदार रवी पाटील, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.पितृपक्ष म्हणजे आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पुण्यकाल मानला जातो. श्राध्द म्हणजे श्रध्दा. मात्र आईवडिलांना जिवंतपणी सन्मान देणे हीच खरी कृतज्ञता आहे. कृतज्ञतेला समाधानाची कास धरल्याशिवाय विकास अशक्य असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर