शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञता म्हणजे हृदयातील परमेश्वराचे सिंहासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 20:02 IST

आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते.

ठळक मुद्देजीवन विद्या मिशनतर्फे तन, मन, धन कार्यशाळापितृपक्ष म्हणजे आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पुण्यकाल

रावेर, जि.जळगाव : आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी ईश्वरशक्ती असून, प्रत्येक माणसात परमेश्वर दडला आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते.म्हणून सर्वांची अर्थात समाजातील प्रत्येक घटकाची कृतज्ञता मानून समाधानाची कास धरल्यास खरा विकास होतो. किंबहुना पुण्य हेच समाधान असून, पुण्याईतूनच मन:शांती लाभत असल्याने खरी पुण्याई प्राप्त होत असते. म्हणून कृतज्ञता हेच खरे हृदयातील परमेश्वराचे सिंहासन असल्याचे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे नामधारक दशरथ शिरसाठ यांनी व्यक्त केले.येथील शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित जीवन विद्या मिशनतर्फे आयोजित तन-मन-धन या कार्यशाळेत ते बोलत होते.प्रारंभी, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष सावंत, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, जळगाव शाखेच्या अध्यक्षा कुंदा नारखेडे, जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक बी.एस.पाटील, कृष्णा म्हसकर व दशरथ शिरसाठ यांच्या हस्ते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वालन करण्यात आले.प्रारंभी, कृष्णा म्हसकर यांनी ‘तन’ या विषयावर बोलताना निसर्गाने बनवलेली ही एक पद्धतशीर व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, तन-मन-धन हा त्रिकोण एकमेकांना पूरक आहे. तन व मन निसर्गाने दिलेले भांडवल आहे. त्यांच्या बळावर धन संपादन करावयाचे असते. लहानपणापासून तू भरपूर मोठा हो, अशी जी अपेक्षा व्यक्त करतो ती त्याच अर्थाने करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामकृष्ण परमहंस यांना पैशाची अ‍ॅलर्जी होती. आता मात्र एनर्जी वाटत असल्याची खंत व्यक्त करून सुधीर फडके यांच्या ‘दाम करी काम रे..’ या गाण्याच्या पंक्ती त्यांनी म्हणून सादर केले.पैसा किती व कसा आहे? पैशासाठी जीवन आहे की जीवनासाठी पैसा आहे? हे अंतर्मुख करणारे प्रश्न असून, धन म्हणजे पैसा, संपत्ती व मुलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त पैशाने माणूस सुखी होतो का? तर नाही. गडगंज पैसा असताना स्वास्थ्य नसल्याचे आपण पाहतो. जीवनात सुख सोयी असेल तर आत्मशांती लाभते. म्हणून सोयी सुविधा किती असाव्यात? किती सोयी सुविधा मिळवायचे? याबाबत माणसाचे विचार करण्याची गरज असून, सोयीसुविधा अधिकाधिक न मिळवता त्याचा आनंद उपभोगता येईल. एवढ्या सोयी सुविधा असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.विश्वस्त संतोष सावंत यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक बी.एस.पाटील, जे.आर.पाटील, मोरगाव येथील उद्योजक आर.एस. पाटील, अमोल महाजन, रमेश महाजन, प्रवीण पाटील, जळगाव शाखेच्या अध्यक्षा कुंदा नारखेडे, पंढरीनाथ वानखेडे, सचिव, खजिनदार रवी पाटील, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.पितृपक्ष म्हणजे आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पुण्यकाल मानला जातो. श्राध्द म्हणजे श्रध्दा. मात्र आईवडिलांना जिवंतपणी सन्मान देणे हीच खरी कृतज्ञता आहे. कृतज्ञतेला समाधानाची कास धरल्याशिवाय विकास अशक्य असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर