शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशाविषयी कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:25 IST

-मिलिंद कुलकर्णी जळगाव : ‘ लोकमत’च्या ४१ वर्षांच्या वाटचालीत खान्देशी जनतेने दिलखुलास प्रेम केले. ‘ लोकमत’ला आपलेसे मानले. समाजजीवनातील ...

-मिलिंद कुलकर्णीजळगाव : ‘लोकमत’च्या ४१ वर्षांच्या वाटचालीत खान्देशी जनतेने दिलखुलास प्रेम केले. ‘लोकमत’ला आपलेसे मानले. समाजजीवनातील प्रत्येक घटकाचे प्रतिबिंब ‘लोकमत’मध्ये उमटावे, यासाठी आग्रही भूमिका राहिली, त्याचे मन:पूर्वक स्वागत झाले. वर्तमानपत्र म्हणून बातम्या देण्याचे काम करण्यासोबतच लोकमत बालविकास मंच, लोकमत सखी मंच, युवानेक्स्ट या माध्यमातून विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केले गेले.देशभरात प्रत्येक क्षेत्रात एक घुसळण सुरु आहे. नवनवे तंत्रज्ञान वेगाने येऊन आदळत आहे, त्याविषयी आकर्षण वाढत आहे, परंतु जुन्या गोष्टींचा मोह सोडवला जात नाही, अशी मानसिकता सामान्य माणसाची दिसून येत आहे.खान्देशच्यादृष्टीने विचार केला तर आम्ही मुंबई-पुण्यासारखे महानगरे नाहीत आणि विदर्भ-मराठवाड्यासारखे अनुशेषाचा फटका बसलेले विभाग नाही. मुळात अभावांची चर्चा न करता संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती खान्देशी माणसामध्ये आहे. ही आव्हाने येत असताना आमच्याकडील उद्योग, व्यापार, व्यवसायांनी काय स्थित्यंतरे अनुभवली, त्यावर मात कशी केली, याचा विस्मयकारी प्रवास वाचकांना उलगडून दाखविण्याचा प्रयत्न वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्याचे ठरविले. हा प्रयत्न वाचकांनाही आवडेल, हा विश्वास आहे.पूर्वजांनी दिलेला उद्योग, व्यापार, व्यवसायाचा वसा घेतल्यानंतर पुढच्या पिढीने काळानुरुप आणि शिक्षण-अनुभवाचा उपयोग करीत त्याला अधिक पुढे नेल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा प्रवास नितांत सुंदर आणि मानवी प्रयत्नांचा विलक्षण मिलाफ दाखविणारा आहे. त्यामुळे ही उदाहरणे केवळ त्या कुटुंबापुरती, उद्योग-व्यवसायापुरती उरत नाही, तर ती संपूर्ण समाजाची होतात. इतिहासात त्याची नोंद होते. यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. अनेक नावे असताना काही निवडक देऊ शकलो, अनेक राहून गेली, ती पुन्हा कधीतरी निश्चितच वाचकांच्या पुढे आणू याची यानिमित्ताने ग्वाही देतो.खान्देशी माणसाच्या धडपड, कष्टकरी वृत्तीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळींनी खान्देशवर नितांत प्रेम केले. त्यामुळे जगभर, भारतभर उद्योग, व्यापाराचा विस्तार करीत असताना मातृभूमी, कर्मभूमीतच मुख्यालय ठेवण्याचा आग्रह या मंडळींनी धरला. कविता, केळी, कापूस, भरीत, सोने, पाईप, दाल अशाने ही ओळख घट्ट होत गेली. कष्ट, कर्तृत्व, अभ्यास आणि नव्याचा शोध घेण्याच्या वृत्तीमुळे ही ओळख दृढ होत गेली. दूरदृष्टी ठेवून अशी क्षेत्रे निवडली की, काळानुसार त्याची गरज होती. मग भंवरलाल जैन यांच्यासारख्या द्रष्टया उद्योजकाने ‘ठिबक सिंचना’चा मंत्र शेतकºयांना दिला. राजमल लखीचंद आणि रतनलाल बाफना यांच्या सारख्या मंडळींनी कलाकुसरीने बनविलेल्या सोने-चांदीच्या आभूषणांची भुरळ जनतेला घातली. किराणा दुकान ते मॉलसारखा प्रयोग राबविणारे कांकरिया, ट्रान्सफॉर्मरचा उद्योग मुंबईसोबतच जळगावात सुरु करणारे मधुसूदन राणे, काळ्याआईची सेवा करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणारे प्रमोद पाटील...किती मोठी परंपरा लाभली आहे खान्देशला. खरोखर अभिमानास्पद अशी कामगिरी आहे, म्हणून ‘लोकमत’ अशा नामवंतांना सलाम करते.वर्तमानपत्र म्हणून समाजापुढील प्रश्न, समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य निष्पक्ष, निडर व परखडपणे ‘लोकमत’ यापुढेही करीत राहील. समाजातील सकारात्मक बाबींना ठळकपणे प्रसिध्दी देण्याचे कार्य अविरत सुरु राहील. वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाचकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव