शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

खान्देशाविषयी कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:25 IST

-मिलिंद कुलकर्णी जळगाव : ‘ लोकमत’च्या ४१ वर्षांच्या वाटचालीत खान्देशी जनतेने दिलखुलास प्रेम केले. ‘ लोकमत’ला आपलेसे मानले. समाजजीवनातील ...

-मिलिंद कुलकर्णीजळगाव : ‘लोकमत’च्या ४१ वर्षांच्या वाटचालीत खान्देशी जनतेने दिलखुलास प्रेम केले. ‘लोकमत’ला आपलेसे मानले. समाजजीवनातील प्रत्येक घटकाचे प्रतिबिंब ‘लोकमत’मध्ये उमटावे, यासाठी आग्रही भूमिका राहिली, त्याचे मन:पूर्वक स्वागत झाले. वर्तमानपत्र म्हणून बातम्या देण्याचे काम करण्यासोबतच लोकमत बालविकास मंच, लोकमत सखी मंच, युवानेक्स्ट या माध्यमातून विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केले गेले.देशभरात प्रत्येक क्षेत्रात एक घुसळण सुरु आहे. नवनवे तंत्रज्ञान वेगाने येऊन आदळत आहे, त्याविषयी आकर्षण वाढत आहे, परंतु जुन्या गोष्टींचा मोह सोडवला जात नाही, अशी मानसिकता सामान्य माणसाची दिसून येत आहे.खान्देशच्यादृष्टीने विचार केला तर आम्ही मुंबई-पुण्यासारखे महानगरे नाहीत आणि विदर्भ-मराठवाड्यासारखे अनुशेषाचा फटका बसलेले विभाग नाही. मुळात अभावांची चर्चा न करता संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती खान्देशी माणसामध्ये आहे. ही आव्हाने येत असताना आमच्याकडील उद्योग, व्यापार, व्यवसायांनी काय स्थित्यंतरे अनुभवली, त्यावर मात कशी केली, याचा विस्मयकारी प्रवास वाचकांना उलगडून दाखविण्याचा प्रयत्न वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्याचे ठरविले. हा प्रयत्न वाचकांनाही आवडेल, हा विश्वास आहे.पूर्वजांनी दिलेला उद्योग, व्यापार, व्यवसायाचा वसा घेतल्यानंतर पुढच्या पिढीने काळानुरुप आणि शिक्षण-अनुभवाचा उपयोग करीत त्याला अधिक पुढे नेल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा प्रवास नितांत सुंदर आणि मानवी प्रयत्नांचा विलक्षण मिलाफ दाखविणारा आहे. त्यामुळे ही उदाहरणे केवळ त्या कुटुंबापुरती, उद्योग-व्यवसायापुरती उरत नाही, तर ती संपूर्ण समाजाची होतात. इतिहासात त्याची नोंद होते. यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. अनेक नावे असताना काही निवडक देऊ शकलो, अनेक राहून गेली, ती पुन्हा कधीतरी निश्चितच वाचकांच्या पुढे आणू याची यानिमित्ताने ग्वाही देतो.खान्देशी माणसाच्या धडपड, कष्टकरी वृत्तीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळींनी खान्देशवर नितांत प्रेम केले. त्यामुळे जगभर, भारतभर उद्योग, व्यापाराचा विस्तार करीत असताना मातृभूमी, कर्मभूमीतच मुख्यालय ठेवण्याचा आग्रह या मंडळींनी धरला. कविता, केळी, कापूस, भरीत, सोने, पाईप, दाल अशाने ही ओळख घट्ट होत गेली. कष्ट, कर्तृत्व, अभ्यास आणि नव्याचा शोध घेण्याच्या वृत्तीमुळे ही ओळख दृढ होत गेली. दूरदृष्टी ठेवून अशी क्षेत्रे निवडली की, काळानुसार त्याची गरज होती. मग भंवरलाल जैन यांच्यासारख्या द्रष्टया उद्योजकाने ‘ठिबक सिंचना’चा मंत्र शेतकºयांना दिला. राजमल लखीचंद आणि रतनलाल बाफना यांच्या सारख्या मंडळींनी कलाकुसरीने बनविलेल्या सोने-चांदीच्या आभूषणांची भुरळ जनतेला घातली. किराणा दुकान ते मॉलसारखा प्रयोग राबविणारे कांकरिया, ट्रान्सफॉर्मरचा उद्योग मुंबईसोबतच जळगावात सुरु करणारे मधुसूदन राणे, काळ्याआईची सेवा करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणारे प्रमोद पाटील...किती मोठी परंपरा लाभली आहे खान्देशला. खरोखर अभिमानास्पद अशी कामगिरी आहे, म्हणून ‘लोकमत’ अशा नामवंतांना सलाम करते.वर्तमानपत्र म्हणून समाजापुढील प्रश्न, समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य निष्पक्ष, निडर व परखडपणे ‘लोकमत’ यापुढेही करीत राहील. समाजातील सकारात्मक बाबींना ठळकपणे प्रसिध्दी देण्याचे कार्य अविरत सुरु राहील. वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाचकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव