शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गावच्या शाळा, विद्यार्थ्यांचे आरोग्य याकडे ग्रामसेवकांनी लक्ष द्या, प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर विसंबून राहू नका!

By अमित महाबळ | Updated: March 4, 2023 20:39 IST

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे विधान

अमित महाबळ, जळगाव: अंगणवाड्यांच्या वीज बिलांसाठी शासनाने बजेटमध्ये ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गावातील शाळा, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील याकडे ग्रामसेवकांनी लक्ष दिले पाहिजे. गावातून करवसुली झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर विसंबून राहू नका, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले. जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागातर्फे शनिवारी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला.

गिरीश महाजन पुढे म्हणाले, की केंद्राकडून कोट्यवधी रुपये योजनांसाठी उपलब्ध होत आहेत. खर्च झाले नाहीत तर आम्हालाही विचारणा होते. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे ही केंद्राची भूमिका आहे. वाडी, वस्ती व दुर्गम भागात सुविधा मिळायला हव्यात. गावाच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. पुण्य केलेले लोकच ग्रामसेवक, तलाठी होतात!

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, पण ग्रामसेवकाशिवाय गावाचा उद्धार शक्य नाही. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी यांची क्रेझ असते, आमचे उतारे त्यांच्या कपाटात असतात. मागील काळात काहीतरी पुण्य केलेले लोकच ग्रामसेवक आणि तलाठी होतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

.. तर आम्हाला घरी जावे लागेल!

आम्हाला कधीच असे पुरस्कार मिळाले नाहीत. ग्रामसेवक वयाच्या ५८ पर्यंत काम करतो. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी साठीपर्यंत राहतील. आम्हाला मात्र पाच वर्षेच आहेत. आता सव्वा वर्ष राहिले आहे. यानंतर लोकांनी मतदान केले तर ठीक नाही, तर घरी जावे लागेल, असेही गुलाबराव पाटील मिश्कीलपणे म्हणाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन