शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाच जागा न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार : जळगावात कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:27 IST

तातडीच्या बैठकीत निर्णय

जळगाव -जिल्ह्यात कॉंग्रेसला ११ पैकी केवळ दोनच जागा मिळत असल्याने जिल्हा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कॉँग्रेसकडे तीव्र संताप व्यक्त केला. कॉँग्रेसला जर ५ जागा मिळाल्या नाहीत तर सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जिल्हा पदाधिकाºयांनी घेतला असल्याची माहिती कॉँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.बुधवारी कॉँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.सलीम पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव उपस्थित होते. सर्वच पदाधिकाºयांनी प्रदेश कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात कॉँग्रेस नेहमीच पाच ते सहा जागा लढवित आली आहे. मात्र, या निवडणुकीत जर जिल्ह्यातील ११ पैकी केवळ २ जागा दिल्या जात असतील तर आम्ही केवळ बैठकीतच यायचे का ? असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी उपस्थित केला.यावर पक्षाचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविण्यात आला आल्याची माहिती मिळाली.उत्तर महाराष्टÑ प्रभारींना पाठविला संदेशया बैठकीत सर्वच पदाधिकाºयांकडून तीव्र भावना व्यक्त होत असल्याने, जिल्हाध्यक्षांनी कॉँग्रेसचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविला. या संदेशात कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात पक्षाला पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यावर रेड्डी यांनी तत्काळ उत्तर देत आपल्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचविण्याचा सूचना दिल्या.मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण व अमळेरसाठी कॉँग्रेस आग्रहीजिल्ह्यात सध्या जळगाव शहर व रावेर या दोनच जागा लढविण्याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हा पदाधिकाºयांना मिळाली होती. मात्र, जिल्ह्यात सध्यस्थितीत राष्टÑवादीची ताकद कमी असल्यामुळे कॉँग्रेसला जास्त मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी या बैठकीत केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्ताईनगरसाठी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जळगाव ग्रामीणमध्ये डी.जी.पाटील व अमळनेरमधून अ‍ॅड.ललिता पाटील यांनी आपण इच्छूक असल्याने या जागा देखील सोडण्यात याव्यात, केवळ २ जागा मिळाल्या तर सर्वांनी राजीनामा देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेतला.सामूहिक राजीनामे देण्याचा कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आला नाही. जिल्ह्यात राष्टÑवादीची कमी झालेली ताकद पाहता कॉँग्रेसला जिल्ह्यात काही जागा वाढवून मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी केली आहे. ही माहिती प्रदेशाध्यक्षांना देण्यात येईल.-अ‍ॅड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस. 

टॅग्स :Jalgaonजळगाव