शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पाच जागा न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार : जळगावात कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:27 IST

तातडीच्या बैठकीत निर्णय

जळगाव -जिल्ह्यात कॉंग्रेसला ११ पैकी केवळ दोनच जागा मिळत असल्याने जिल्हा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कॉँग्रेसकडे तीव्र संताप व्यक्त केला. कॉँग्रेसला जर ५ जागा मिळाल्या नाहीत तर सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जिल्हा पदाधिकाºयांनी घेतला असल्याची माहिती कॉँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.बुधवारी कॉँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.सलीम पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव उपस्थित होते. सर्वच पदाधिकाºयांनी प्रदेश कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात कॉँग्रेस नेहमीच पाच ते सहा जागा लढवित आली आहे. मात्र, या निवडणुकीत जर जिल्ह्यातील ११ पैकी केवळ २ जागा दिल्या जात असतील तर आम्ही केवळ बैठकीतच यायचे का ? असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी उपस्थित केला.यावर पक्षाचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविण्यात आला आल्याची माहिती मिळाली.उत्तर महाराष्टÑ प्रभारींना पाठविला संदेशया बैठकीत सर्वच पदाधिकाºयांकडून तीव्र भावना व्यक्त होत असल्याने, जिल्हाध्यक्षांनी कॉँग्रेसचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविला. या संदेशात कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात पक्षाला पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यावर रेड्डी यांनी तत्काळ उत्तर देत आपल्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचविण्याचा सूचना दिल्या.मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण व अमळेरसाठी कॉँग्रेस आग्रहीजिल्ह्यात सध्या जळगाव शहर व रावेर या दोनच जागा लढविण्याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हा पदाधिकाºयांना मिळाली होती. मात्र, जिल्ह्यात सध्यस्थितीत राष्टÑवादीची ताकद कमी असल्यामुळे कॉँग्रेसला जास्त मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी या बैठकीत केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्ताईनगरसाठी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जळगाव ग्रामीणमध्ये डी.जी.पाटील व अमळनेरमधून अ‍ॅड.ललिता पाटील यांनी आपण इच्छूक असल्याने या जागा देखील सोडण्यात याव्यात, केवळ २ जागा मिळाल्या तर सर्वांनी राजीनामा देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेतला.सामूहिक राजीनामे देण्याचा कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आला नाही. जिल्ह्यात राष्टÑवादीची कमी झालेली ताकद पाहता कॉँग्रेसला जिल्ह्यात काही जागा वाढवून मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी केली आहे. ही माहिती प्रदेशाध्यक्षांना देण्यात येईल.-अ‍ॅड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस. 

टॅग्स :Jalgaonजळगाव