शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शासनाची भरड धान्य खरेदी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला, तरी खरेदी सुरू न ...

अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला, तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे, तर काहींना कमी भावात खुल्या बाजारत धान्य विक्री करावे लागत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत.

राज्य शासनाने भरड धान्य खरेदी योजनेत ज्वारी, मका, गहू खरेदी योजना सुरू करून, १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन नावे नोंदणी सुरू केली होती. नावे नोंदणीस मुदतवाढ मिळणार नाही, असे सक्त ताकिदीचे पत्र ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगरे यांनी दिले होते. शासनाने हायब्रीड ज्वारीसाठी २,६२० रुपये, माल दांडी ज्वारीसाठी २,६४० रुपये, मका १,८५० रुपये, गहू १,९७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. अमळनेर तालुक्यात ५८९ शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी तर १,०७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपून २५ दिवस उलटले, तरी शासनाने खरेदी सुरू झाली नाही. योग्य भाव मिळेल, नोंदणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल घरात साठवून ठेवला आहे. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी तथा शेती मशागत, बी- बियाणे खरेदीसाठी पैसे लागणार असल्याने, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपला माल विक्री सुरू केला असून, व्यापारी या संधीचा फायदा घेत मका फक्त १,४०० रुपये क्विंटल तर ज्वारी निम्मे भावाने म्हणजे १,३०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करत आहेत.

शासनाची भरड धान्य योजना फसवी असून, शेतकऱ्यांना निम्मे भावात ज्वारी विकावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

- स्मिता वाघ, माजी आमदार, भाजप

रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी यंत्रणा तयार आहे. गोदाम उपलब्ध असून, २० हजार क्विंटल धान्य खरेदी करण्याची क्षमता असून, ज्वारी मका नोंदणी झाली आहे. गहूची नोंदणी झाली नाही. वरिष्ठांचे आदेश येताच खरेदी सुरू होईल.

- संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर

ज्वारी मका इत्यादी रब्बी पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा सर्व माल शेतकऱ्याकडे पडून आहे. पावसाळा जवळ आल्याने त्यात अळ्या, किडे पडून खराब होईल, तसेच खरीप हंगामात शेतकरी वर्गाला आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने खरेदी सुरू करून, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- धनंजय एकनाथ पाटील, शेतकरी, दहिवद, ता.अमळनेर.