शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

शासनाची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 12:03 IST

अजय पाटीलमनपाच्या मुदत संपलेल्या महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांची गुरुवारी मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत होणारी बैठक अचानक रद्द झाली. शासनाकडून असलेल्या गाळेधारकांच्या अपेक्षांना धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे जप्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अशा ...

अजय पाटीलमनपाच्या मुदत संपलेल्या महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांची गुरुवारी मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत होणारी बैठक अचानक रद्द झाली. शासनाकडून असलेल्या गाळेधारकांच्या अपेक्षांना धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे जप्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही केवळ राजकीय हेतूने शासनाकडून गाळेधारकांना कायदेशीर चौकटीचा आधार घेऊन काही आश्वासने दिली जात आहेत. जिल्हा न्यायालयात गाळेधारकांची याचिका फेटाळल्यानंतर ३ मे रोजी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे बैठक होणार असल्याने गाळेधारकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, ही बैठक रद्द झाल्याची माहिती बुधवारी गाळेधारकांना मिळाल्यानंतर गाळेधारकांना मोठा धक्का बसला. कोणतेही शासन न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करू शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन शासनाने काही भूमिका घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान होतो. मात्र, शासनाला एकीकडे न्यायालयाचा अवमान होणार नाही याचीही खबरदारी घ्यावयाची आहे व गाळेधारकांच्या आशादेखील कायम ठेवायच्या आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत हा मुद्दा तापवून ठेवत राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी महात्मा फुले मार्केटमधील ९ गाळे सील केले होते. मात्र, शासनाच्या हस्तक्षेपामुळे हे सील केलेले गाळे मनपाला उघडावे लागले होते. त्यानंतर न्यायालयाने याबाबत शासनाला न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केल्यामुळे खडसावले होते. दरम्यान, ३ मे रोजी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे गाळेधारकांची बैठक झाली असती किंवा त्यात काही निर्णय घेण्यात आला असता तर हा न्यायालयाच्या अवमान समजला गेला असता. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयात शासनाकडून हस्तक्षेप होताना दिसत नाही. केवळ निवडणुकीपर्यंत हा विषय लांबविण्याचा प्रयत्न सध्या दिसत आहे. मात्र, गाळेधारकांना शासनाकडून अजूनही काही चमत्कार होईल अपेक्षा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव