शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जळगावातील शिवाजीनगर, पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी शासन ५० टक्के निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:25 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आश्वासन

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिवाजी नगर पुलांच्या कामाला मंजुरी नसल्याने काम प्रलंबित आहेदोन वर्षात जळगाव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्तजिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : शहरातील शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा रेल्वे उड्डाणपुलांना शासन ५० टक्के निधी देईल. दोन वर्षात शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्त होईल, तसेच औरंगाबाद-जळगाव मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने अजिंठा चौफुलीपासून सुरू केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकात पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचा विषय मांडताना माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे नकाशेदेखील रेल्वेकडून तयार आहेत. मात्र ५० टक्के खर्च रेल्वे तर ५० टक्के खर्च राज्य शासन करणार असे ठरले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबत मंजुरी नसल्याने या पुलाचे काम प्रलंबित आहे. हा पूल ११३ वर्ष इतका जीर्ण झाला आहे. त्यामुळे तातडीने याचे काम होणे आवश्यक आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर सोनवणे यांनी शिवाजीनगर पुलाचा रस्ता हा मनपाच्या हद्दीत येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याऐवजी नगरविकास खाते त्यासाठी निधी देईल, असे सांगितले. तर लढ्ढा यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी ‘तो कशासाठी वर्ग केला ते माहीत आहे,’ असा टोला लगावला. मात्र रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणे महत्त्वाचे आहे, मनपा उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे निधी नगरविकास देईल की सार्वजनिक बांधकाम विभाग, कोणत्या हेडखाली टाकायचा? ते मी बघतो, असे सांगितले.अजिंठा चौफुलीवर दररोज अपघात, उपाययोजना कधी करणार?नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असून त्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव-औरंगाबाद हा राष्टÑीय महामार्ग घोषित झाला असून त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नेरीजवळ काम सुरू आहे. जर चौपदरीकरणाचे काम अजिंठा चौफुलीपासून एमआयडीसीपर्यंत तातडीने सुरू केले तर वाहतुकीची कोंडी दूर होऊन अपघातांना आळा बसू शकेल, असा मुद्दा मांडला. आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही अजिंठा चौफुलीवर दर आठवड्याला एक बळी जात असल्याचे सांगत आजही एक बळी गेला असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता सोनवणे यांनी १६० किमी लांबीचे चौपदरीकरण होत असून जिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण होत आहे. सुरुवातीचे ६ किमी चौपदरीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले की, या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. ते काम पहिले अजिंठा चौफुलीपासून व्हावे, म्हणजे समस्या तातडीने मिटेल, असे म्हणणे आहे. बैठक संपल्यावर औरंगाबादचे मुख्य अभियंता जोशी यांच्याशी बोलणे करून द्या, त्यांना याबाबत सूचना देतो, असे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावchandrakant patilचंद्रकांत पाटील