शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जळगावातील शिवाजीनगर, पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी शासन ५० टक्के निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:25 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आश्वासन

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिवाजी नगर पुलांच्या कामाला मंजुरी नसल्याने काम प्रलंबित आहेदोन वर्षात जळगाव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्तजिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : शहरातील शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा रेल्वे उड्डाणपुलांना शासन ५० टक्के निधी देईल. दोन वर्षात शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्त होईल, तसेच औरंगाबाद-जळगाव मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने अजिंठा चौफुलीपासून सुरू केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकात पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचा विषय मांडताना माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे नकाशेदेखील रेल्वेकडून तयार आहेत. मात्र ५० टक्के खर्च रेल्वे तर ५० टक्के खर्च राज्य शासन करणार असे ठरले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबत मंजुरी नसल्याने या पुलाचे काम प्रलंबित आहे. हा पूल ११३ वर्ष इतका जीर्ण झाला आहे. त्यामुळे तातडीने याचे काम होणे आवश्यक आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर सोनवणे यांनी शिवाजीनगर पुलाचा रस्ता हा मनपाच्या हद्दीत येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याऐवजी नगरविकास खाते त्यासाठी निधी देईल, असे सांगितले. तर लढ्ढा यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी ‘तो कशासाठी वर्ग केला ते माहीत आहे,’ असा टोला लगावला. मात्र रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणे महत्त्वाचे आहे, मनपा उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे निधी नगरविकास देईल की सार्वजनिक बांधकाम विभाग, कोणत्या हेडखाली टाकायचा? ते मी बघतो, असे सांगितले.अजिंठा चौफुलीवर दररोज अपघात, उपाययोजना कधी करणार?नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असून त्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव-औरंगाबाद हा राष्टÑीय महामार्ग घोषित झाला असून त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नेरीजवळ काम सुरू आहे. जर चौपदरीकरणाचे काम अजिंठा चौफुलीपासून एमआयडीसीपर्यंत तातडीने सुरू केले तर वाहतुकीची कोंडी दूर होऊन अपघातांना आळा बसू शकेल, असा मुद्दा मांडला. आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही अजिंठा चौफुलीवर दर आठवड्याला एक बळी जात असल्याचे सांगत आजही एक बळी गेला असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता सोनवणे यांनी १६० किमी लांबीचे चौपदरीकरण होत असून जिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण होत आहे. सुरुवातीचे ६ किमी चौपदरीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले की, या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. ते काम पहिले अजिंठा चौफुलीपासून व्हावे, म्हणजे समस्या तातडीने मिटेल, असे म्हणणे आहे. बैठक संपल्यावर औरंगाबादचे मुख्य अभियंता जोशी यांच्याशी बोलणे करून द्या, त्यांना याबाबत सूचना देतो, असे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावchandrakant patilचंद्रकांत पाटील