शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शिवाजीनगर, पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी शासन ५० टक्के निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:25 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आश्वासन

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिवाजी नगर पुलांच्या कामाला मंजुरी नसल्याने काम प्रलंबित आहेदोन वर्षात जळगाव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्तजिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : शहरातील शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा रेल्वे उड्डाणपुलांना शासन ५० टक्के निधी देईल. दोन वर्षात शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा रेल्वे फाटकमुक्त होईल, तसेच औरंगाबाद-जळगाव मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने अजिंठा चौफुलीपासून सुरू केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकात पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचा विषय मांडताना माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे नकाशेदेखील रेल्वेकडून तयार आहेत. मात्र ५० टक्के खर्च रेल्वे तर ५० टक्के खर्च राज्य शासन करणार असे ठरले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबत मंजुरी नसल्याने या पुलाचे काम प्रलंबित आहे. हा पूल ११३ वर्ष इतका जीर्ण झाला आहे. त्यामुळे तातडीने याचे काम होणे आवश्यक आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर सोनवणे यांनी शिवाजीनगर पुलाचा रस्ता हा मनपाच्या हद्दीत येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याऐवजी नगरविकास खाते त्यासाठी निधी देईल, असे सांगितले. तर लढ्ढा यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी ‘तो कशासाठी वर्ग केला ते माहीत आहे,’ असा टोला लगावला. मात्र रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणे महत्त्वाचे आहे, मनपा उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे निधी नगरविकास देईल की सार्वजनिक बांधकाम विभाग, कोणत्या हेडखाली टाकायचा? ते मी बघतो, असे सांगितले.अजिंठा चौफुलीवर दररोज अपघात, उपाययोजना कधी करणार?नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असून त्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव-औरंगाबाद हा राष्टÑीय महामार्ग घोषित झाला असून त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नेरीजवळ काम सुरू आहे. जर चौपदरीकरणाचे काम अजिंठा चौफुलीपासून एमआयडीसीपर्यंत तातडीने सुरू केले तर वाहतुकीची कोंडी दूर होऊन अपघातांना आळा बसू शकेल, असा मुद्दा मांडला. आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही अजिंठा चौफुलीवर दर आठवड्याला एक बळी जात असल्याचे सांगत आजही एक बळी गेला असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता सोनवणे यांनी १६० किमी लांबीचे चौपदरीकरण होत असून जिल्ह्यात ५० किमी लांबीचे चौपदरीकरण होत आहे. सुरुवातीचे ६ किमी चौपदरीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले की, या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. ते काम पहिले अजिंठा चौफुलीपासून व्हावे, म्हणजे समस्या तातडीने मिटेल, असे म्हणणे आहे. बैठक संपल्यावर औरंगाबादचे मुख्य अभियंता जोशी यांच्याशी बोलणे करून द्या, त्यांना याबाबत सूचना देतो, असे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावchandrakant patilचंद्रकांत पाटील