शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी - जसपालसिंग बग्गा यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:05 IST

‘टोलमुक्त भारत’ची घोषणा विरली हवेतच

ठळक मुद्देराज्य सरकारकडूनही अपेक्षाभंगआगामी निवडणुकीत विरोध पत्करावा लागेल

जळगाव : वाहतूकदारांचा टोल माफीचा प्रश्न असो की या क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रश्न अथवा इतर सर्वच समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असून आहे. हे सरकारवाहतूकदारांना केवळ खेळवित असल्याचा आरोप जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला. चार वर्षांपूर्वी सरकारने केलेली ‘टोलमुक्त भारत’ची घोषणाही हवेत विरल्याचा दावा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरात वाहतूकदारांनी संप पुकारला असून त्यामुळे मालाच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. असे असले तरी त्यावर तोडगा निघत नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचीही वाहतूक रोखण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने वाहतूकदारांच्या प्रश्नांवर पप्पू बग्गा यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यांच्याशी झालेला हा संवाद....प्रश्न - सरकारकडे आपली कोणती मागणी प्रलंबित आहे ?उत्तर - वाहतूकदारांना देशभरात टोल कर माफ करण्याची मागणी केलेली आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने २०१५मध्ये वाहतूकदारांनी संप पुकारला होता. त्या वेळी सरकारने ‘टोलमुक्त भारत’ची घोषणा केली होती. मात्र इतके वर्ष झाले तरी त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. हे सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नाही.प्रश्न - वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून कसा प्रतिसाद मिळत आहे?उत्तर - सरकार केवळ आम्हाला खेळवत आहे. वाहतूकदार हा देशातील कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात जावून सेवा देत असतो. या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी आम्ही २०१३मध्ये केली होती. त्या वेळी नकार मिळाला. आताही सरकार आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे काही देत नाही. एकूणच कोणत्याही समस्या सोडविण्यास प्रतिसाद मिळत नाही.प्रश्न - इंधन दरवाढीच्या तुलनेत वाढीव भाडे मिळते का?उत्तर - इंधन दरवाढीत वारंवार होणारी वाढ डोकेदुखी ठरते. त्यामुळे अशी किरकोळ दरवाढ न करता सरकारकडे आम्ही एक महिना अथवा दोन महिन्यात एक रुपया अथवा दोन रुपये अशी वाढ करण्याची मागणी केली आहे. कारण वारंवार होणाºया किरकोळ दरवाढीच्या तुलनेत आम्हाला वाढीव भाडे मिळत नाही. यात काही जणांशी करार झालेले असतात, ते अशी भाडेवाढ देण्यास नकार देतात. सरकारने इंधन दरवाढीबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.प्रश्न - ई-वे बिलामुळे वाहतुकीतील अडथळे दूर झाले का?उत्तर - वस्तू व सेवा करात (जीएसटी) माल वाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली अंमलात आणली असली तरी ई-वे बिलाच्या क्रमांक नोंदणीसाठी पुरेसे साधने नसल्याने वाहतूकदारांना अडचणी येतात. त्यामुळे माल वाहतुकीच्या समस्या कायम आहे.राज्य सरकारकडूनही अपेक्षाभंगराज्य सरकारनेदेखील राज्यातील मोठे टोल माफ केलेच नाही. लहान टोल बंद केले असले तरी वाहतूकदारांची खरी समस्या मोठ्या टोलवर असते. एकदा मोठे वाहन निघाले तर त्याला एकेका टोलवर ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात. माल वाहतुकीच्या मार्गावर किमान १० टोल लागतात. त्यामुळे एका बाजूने चार हजार रुपये व परतीच्या प्रवासात चार हजार असे केवळ दहा टोल लागले तरी आठ हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे राज्य सरकारकडूनही अपेक्षाभंग होत असल्याचे जसपालसिंग बग्गा यांनी सांगितले.आगामी निवडणुकीत विरोध पत्करावा लागेलवाहतूकदारांच्या या समस्यांसह विम्याचाही प्रश्न मार्गी लागत नसल्याने वाहतूकदारांचे सर्वच प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे सरकारला २०१९मध्ये या सर्वांचा विरोध पत्करावा लागणार असल्याचा इशारा पप्पू बग्गा यांनी दिला.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव