शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST

आम्रमोहोर बहरला : थंडीमुळे पोषक वातावरण, सुगीचाही बहर, शेतकºयांच्या आशा पल्लवित

भडगाव : तालुक्यात  सध्या   रब्बी पिकांच्या हिरवळीने शेतशिवार नटला आहे.  त्यात आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहोर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे.तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. इतर पिकासोबतच आजोबा-पणजोबांनी शेताच्या बांध कोºयावर, जामदा उजवा-डावा कालव्यावर विविध आंब्याची रोपे लावली असून ती आज डेरेदार वृक्ष झाली आहेत.  या आंबे फळबहार खरेदी विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयाची आर्थिक उलाढाल केली जाते. आंबे हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळून उत्पन्नासाठी आधार बनले आहे. तालुक्यात गावरान जातीची आंब्याची झाडे  मोठ्या प्रमाणावर आहेत. यात सोप्या, दोडी, गोट्या,  सेंद्र्या, काळ्या, बाजºया, लंगड्या, ढवळ्या अशी आंब्याची नावे आहेत. थंडीमुळे आंब्यांने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहोर बहरल्याचे दिसत आहे.  यंदा जमिनीत जलपातळी चांगली असल्याने आम्रमोहोर बहरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. या झाडांचा सौदा केला जातो. आंबे खरेदी-विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. जामदा उजवा-डावा कालव्यावरील आंब्याच्या झाडांचाही व्यापाºयांना लिलाव दिला जातो.  शेतकºयांना आंबे उत्पन्नातून संसाराचा गाडा चालविण्यास मोठा आधखार मिळत आहे.  शेतकरी तुरळकच आंबे लागवड करतात. शासन तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंब, चिंच, सिसम लागवड करते. तालुक्यात आंबे लागवडीचे प्रमाण अधिक वाढवावे. कारण यामुळे शेतकºयांना उत्पन्न वाढीसाठी लाभ होऊ शकतो.तालुक्यातील बात्सर येथे गावकºयांनी हजारो आंब्याची झाडे लावून ती जतन ेकेली आहेत. त्यामुळे गावाला हे उत्पन्नाचे साधन बनणार आहे. बात्सर गावाचा आदर्श घेऊन शासनाने गावोगावी आंब्याची रोपे अधिक प्रमाणात लावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाटबंधारे विभागानेही जामदा उजवा-डाव्या कालव्यालगत आंबे लागवडीचे नियोजन करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.पूर्वी लावलेली डेरेदार आंब्याची झाडे, आमराया  नजरेस पडत आहेत. मात्र  शेतकरीच  हिरव्या डेरेदार वृक्षांवर घाव घालून या झाडांची कत्तल करीत आहे. अवैधरीत्या या झाडांची तोड केली जात असतानाचे दृष्य नजरेला पडत आहे. या आंब्याच्या झाडांची कत्तल थांबवणे गरजेचे आहे तर आमराया लवकरच नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.  वादळवाºयानेही आंब्याची झाडे, फांद्या तुटून मोठे नुकसान होते. हे नुकसान रोखणे आवश्यक आहे.