शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST

आम्रमोहोर बहरला : थंडीमुळे पोषक वातावरण, सुगीचाही बहर, शेतकºयांच्या आशा पल्लवित

भडगाव : तालुक्यात  सध्या   रब्बी पिकांच्या हिरवळीने शेतशिवार नटला आहे.  त्यात आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहोर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे.तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. इतर पिकासोबतच आजोबा-पणजोबांनी शेताच्या बांध कोºयावर, जामदा उजवा-डावा कालव्यावर विविध आंब्याची रोपे लावली असून ती आज डेरेदार वृक्ष झाली आहेत.  या आंबे फळबहार खरेदी विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयाची आर्थिक उलाढाल केली जाते. आंबे हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळून उत्पन्नासाठी आधार बनले आहे. तालुक्यात गावरान जातीची आंब्याची झाडे  मोठ्या प्रमाणावर आहेत. यात सोप्या, दोडी, गोट्या,  सेंद्र्या, काळ्या, बाजºया, लंगड्या, ढवळ्या अशी आंब्याची नावे आहेत. थंडीमुळे आंब्यांने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहोर बहरल्याचे दिसत आहे.  यंदा जमिनीत जलपातळी चांगली असल्याने आम्रमोहोर बहरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. या झाडांचा सौदा केला जातो. आंबे खरेदी-विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. जामदा उजवा-डावा कालव्यावरील आंब्याच्या झाडांचाही व्यापाºयांना लिलाव दिला जातो.  शेतकºयांना आंबे उत्पन्नातून संसाराचा गाडा चालविण्यास मोठा आधखार मिळत आहे.  शेतकरी तुरळकच आंबे लागवड करतात. शासन तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंब, चिंच, सिसम लागवड करते. तालुक्यात आंबे लागवडीचे प्रमाण अधिक वाढवावे. कारण यामुळे शेतकºयांना उत्पन्न वाढीसाठी लाभ होऊ शकतो.तालुक्यातील बात्सर येथे गावकºयांनी हजारो आंब्याची झाडे लावून ती जतन ेकेली आहेत. त्यामुळे गावाला हे उत्पन्नाचे साधन बनणार आहे. बात्सर गावाचा आदर्श घेऊन शासनाने गावोगावी आंब्याची रोपे अधिक प्रमाणात लावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाटबंधारे विभागानेही जामदा उजवा-डाव्या कालव्यालगत आंबे लागवडीचे नियोजन करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.पूर्वी लावलेली डेरेदार आंब्याची झाडे, आमराया  नजरेस पडत आहेत. मात्र  शेतकरीच  हिरव्या डेरेदार वृक्षांवर घाव घालून या झाडांची कत्तल करीत आहे. अवैधरीत्या या झाडांची तोड केली जात असतानाचे दृष्य नजरेला पडत आहे. या आंब्याच्या झाडांची कत्तल थांबवणे गरजेचे आहे तर आमराया लवकरच नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.  वादळवाºयानेही आंब्याची झाडे, फांद्या तुटून मोठे नुकसान होते. हे नुकसान रोखणे आवश्यक आहे.