शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST

आम्रमोहोर बहरला : थंडीमुळे पोषक वातावरण, सुगीचाही बहर, शेतकºयांच्या आशा पल्लवित

भडगाव : तालुक्यात  सध्या   रब्बी पिकांच्या हिरवळीने शेतशिवार नटला आहे.  त्यात आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहोर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे.तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. इतर पिकासोबतच आजोबा-पणजोबांनी शेताच्या बांध कोºयावर, जामदा उजवा-डावा कालव्यावर विविध आंब्याची रोपे लावली असून ती आज डेरेदार वृक्ष झाली आहेत.  या आंबे फळबहार खरेदी विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयाची आर्थिक उलाढाल केली जाते. आंबे हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळून उत्पन्नासाठी आधार बनले आहे. तालुक्यात गावरान जातीची आंब्याची झाडे  मोठ्या प्रमाणावर आहेत. यात सोप्या, दोडी, गोट्या,  सेंद्र्या, काळ्या, बाजºया, लंगड्या, ढवळ्या अशी आंब्याची नावे आहेत. थंडीमुळे आंब्यांने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहोर बहरल्याचे दिसत आहे.  यंदा जमिनीत जलपातळी चांगली असल्याने आम्रमोहोर बहरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. या झाडांचा सौदा केला जातो. आंबे खरेदी-विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. जामदा उजवा-डावा कालव्यावरील आंब्याच्या झाडांचाही व्यापाºयांना लिलाव दिला जातो.  शेतकºयांना आंबे उत्पन्नातून संसाराचा गाडा चालविण्यास मोठा आधखार मिळत आहे.  शेतकरी तुरळकच आंबे लागवड करतात. शासन तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंब, चिंच, सिसम लागवड करते. तालुक्यात आंबे लागवडीचे प्रमाण अधिक वाढवावे. कारण यामुळे शेतकºयांना उत्पन्न वाढीसाठी लाभ होऊ शकतो.तालुक्यातील बात्सर येथे गावकºयांनी हजारो आंब्याची झाडे लावून ती जतन ेकेली आहेत. त्यामुळे गावाला हे उत्पन्नाचे साधन बनणार आहे. बात्सर गावाचा आदर्श घेऊन शासनाने गावोगावी आंब्याची रोपे अधिक प्रमाणात लावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाटबंधारे विभागानेही जामदा उजवा-डाव्या कालव्यालगत आंबे लागवडीचे नियोजन करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.पूर्वी लावलेली डेरेदार आंब्याची झाडे, आमराया  नजरेस पडत आहेत. मात्र  शेतकरीच  हिरव्या डेरेदार वृक्षांवर घाव घालून या झाडांची कत्तल करीत आहे. अवैधरीत्या या झाडांची तोड केली जात असतानाचे दृष्य नजरेला पडत आहे. या आंब्याच्या झाडांची कत्तल थांबवणे गरजेचे आहे तर आमराया लवकरच नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.  वादळवाºयानेही आंब्याची झाडे, फांद्या तुटून मोठे नुकसान होते. हे नुकसान रोखणे आवश्यक आहे.