शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोन्याला मिळणार अधिक चकाकी, ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 00:56 IST

वाढीव कर्जामुळे वाढणार खेळते भांडवल

जळगाव : रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात सुवर्ण तारण योजनेची व्याप्ती वाढवून आता थेट ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळण्याची घोषणा केल्याने सोन्याचे महत्त्व अधिक वाढून त्यातून मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे सोन्याची आणखी मागणी वाढून या धोरणामुळे सोन्याची चकाकी अधिकच वाढण्याचा सूर उमटत आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी गुरुवारी पतधोरण जाहीर केले. यामध्ये मासिक हप्त्याबाबत अपेक्षित घोषणा झाली नसली तरी सोन्याच्या बाबतीत मोठी घोषणा केल्याने सुवर्णनगरी जळगावातून या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या संकटात अधिक परतावा मिळणार असल्याने त्याचा लाभ सर्वांनाच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसे पाहता गेल्या काही महिन्यांपासून सोने तारण योजनेकडे अधिक कल वाढला असून, बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदरही कमी केले आहे. यामध्ये तारण ठेवलेल्या सोन्यावर त्याच्या मूल्याच्या ७५ टक्के कर्ज मिळते. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवून थेट ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे ओढावलेल्या बिकट आर्थिक स्थितीत गरजवंतांच्या हाती अधिक पैसा उपलब्ध होऊन गरजा पूर्ण होणार असल्याने या स्थितीतून ही तारण योजनाच खºया अर्थाने सर्वांना तारणार असल्याच्या प्रतिक्रि या उमटत आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला झळ बसत असताना सोने-चांदीत मात्र मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सध्या सोन्याकडे पाहिले जात आहे.या धोरणाचे स्वागत असून, यामुळे अधिक परतावा मिळणार आहे. सोबतच बँकांकडे ओघ वाढून सोने न मोडता सुरक्षितही राहू शकेल. यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढू शकते.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

टॅग्स :businessव्यवसायGoldसोनं