शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सोने पोहचले ४३ हजारावर, सोन्यात १० दिवसात २१०० तर चांदीत तीन हजाराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:43 IST

जागतिक पातळीवर वाढतेय सोन्यात गुंतवणूक

विजयकुमार सैतवालजळगाव : भारतीय रुपयात सातत्याने होत असलेल्या घसरणीसह मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातीलही शेअर बाजार सतत गडगडत असल्यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे १० दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार १०० रुपयांनी तर चांदीमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचे भाव आणखी एका नवीन उच्चांकीवर पोहचले आहे. शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी सोने प्रथमच ४३ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले तर चांदी शुक्रवारच्या ४९ हजार रुपये प्रती किलोच्या भावावर स्थिर आहे.सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढतोय कलअमेरिका, इराण यांच्यातील तणावामुळे जानेवारीपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वधारु लागले. मध्यंतरी तणावाचे वातावरण काहीसे कमी झाल्याने सोने-चांदीत नरमाई आली. मात्र आता पुन्हा तणाव वाढीचे चिन्ह असल्याने व त्यात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच आहे. यात भरात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असल्याने अमेरिका, जपान, इंग्लंड या प्रमुख देशांसह भारतातही सोन्यामध्ये गुंतवणुकीकडे कल वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे एकूणच जागतिक पातळीवरील तणाव, भारतीय रुपयातील तसेच शेअर बाजारातील घसरण अशा तीन कारणांनी सोने-चांदीच्या भावाला चांगलीच ‘झळाळी’ येत आहे.दीड महिन्यात तीन उच्चांक पातळीसोन्याच्या भावाचा विचार केला तर या मौल्यवान धातूने दीड महिन्यात तीन नवीन उच्चांकी गाठली आहे. ७ जानेवारी २०२० रोजी सोने ४१ हजार ४०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी ४२ हजार रुपये व आता २२ फेब्रुवारी रोजी ४३ हजार रुपये प्रती तोळा, असे उच्चांकीचे भाव सोने गाठत आहे.१० दिवसात २१०० रुपयांनी वाढवरील सर्व कारणांमुळे गेल्या १० दिवसात सोन्याचे भाव तब्बत दोन हजार १०० रुपये प्रती तोळ््याने वाढले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ रोजी ४१ हजारावर पोहचले. हळूहळू वाढ होत जाऊन १९ रोजी ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० रोजी ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ रोजी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहचले व २२ रोजी तर ४३ हजाराचा टप्पा सोन्याने गाठला.चांदीलाही ‘चकाकी’गेल्या १० दिवसांपासून चांदीचेही भाव सतत वाढतच आहे. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार रुपयांवर पोहचले. १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रती किलोवर चांदी पोहचली. २२ रोजीदेखील ती ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.रुपयातील घसरणीसह शेअर बाजारतही घसरण होत असल्याने सोने-चांदीच्या गुंतवणुकीकडे कल वाढत आहे. त्यामुळे या धातूंचे भाव सातत्याने वाढत आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव