शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:00 IST

अतिउच्चांकीवर पोहचल्याने काहीसी नरमाई

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून सतत भाव वाढ होऊन अतिउच्चांकीवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मंगळवार, २५ रोजी ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने ४३ हजार ८०० रुपयांवरून ४३ हजार २०० रुपयांवर आले. चांदीचे भाव मात्र ४९ हजार रुपयांवर स्थिर आहेत.सोने मोडसाठी गर्दीगेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत गेल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच गेले. यात भरात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण झाल्याने भाववाढीत भर पडत गेली. त्यामुळे सोने कधी नव्हे ते ४३ हजार ८०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीदेखील ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. हे भाव अतिउच्चांकीवर पोहचल्याने ग्राहकांचा मोडकडे कल वाढला व सुवर्ण पेढ्यांमध्ये सोने मोडण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे सोमवारी बऱ्याच सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी झाली होती. एकतर भाव एकदम वाढले व सर्वत्र सोने मोडकडे कल वाढल्याने सोन्याच्या भावात काहीसी नरमाई आली. त्यामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात थेट ६०० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन सोने ४३ हजार २०० रुपये प्रती तोळ््यावर आले.१२ दिवसात मोठी वाढ१२ दिवसात सोन्याचे भाव तब्बल दोन हजार १०० रुपये प्रती तोळ््याने वाढले होते. १२ फेब्रुवारी रोजी सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ रोजी ४१ हजारावर पोहचले. हळूहळू वाढ होत जाऊन १९ रोजी ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० रोजी ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ रोजी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहचले व २२ रोजी तर ४३ हजाराचा टप्पा सोन्याने गाठला. सोमवार, २४ रोजी पुन्हा सोने ८०० रुपयांनी वाढून ते ४३ हजार ८०० रुपयांवर पोहचले. या सोबतच चांदीचेही भाव सतत वाढतच गेले. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार, १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. २५ फेब्रुवारीपर्यंत ती ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.अशा प्रकारे एकदम मोठी वाढ झाल्याने भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. हे भाव अतिउच्चांकीवर पोहचल्याने त्यात मंगळवारी काहीसी नरमाई आली. भाव वाढल्याने अनेकांचा सोन्याच्या मोडकडे कल वाढल्याने त्यासाठी गर्दीदेखील झाली.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव. 

टॅग्स :Jalgaonजळगाव