शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:00 IST

अतिउच्चांकीवर पोहचल्याने काहीसी नरमाई

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून सतत भाव वाढ होऊन अतिउच्चांकीवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मंगळवार, २५ रोजी ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने ४३ हजार ८०० रुपयांवरून ४३ हजार २०० रुपयांवर आले. चांदीचे भाव मात्र ४९ हजार रुपयांवर स्थिर आहेत.सोने मोडसाठी गर्दीगेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत गेल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच गेले. यात भरात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण झाल्याने भाववाढीत भर पडत गेली. त्यामुळे सोने कधी नव्हे ते ४३ हजार ८०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीदेखील ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. हे भाव अतिउच्चांकीवर पोहचल्याने ग्राहकांचा मोडकडे कल वाढला व सुवर्ण पेढ्यांमध्ये सोने मोडण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे सोमवारी बऱ्याच सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी झाली होती. एकतर भाव एकदम वाढले व सर्वत्र सोने मोडकडे कल वाढल्याने सोन्याच्या भावात काहीसी नरमाई आली. त्यामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात थेट ६०० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन सोने ४३ हजार २०० रुपये प्रती तोळ््यावर आले.१२ दिवसात मोठी वाढ१२ दिवसात सोन्याचे भाव तब्बल दोन हजार १०० रुपये प्रती तोळ््याने वाढले होते. १२ फेब्रुवारी रोजी सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ रोजी ४१ हजारावर पोहचले. हळूहळू वाढ होत जाऊन १९ रोजी ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० रोजी ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ रोजी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहचले व २२ रोजी तर ४३ हजाराचा टप्पा सोन्याने गाठला. सोमवार, २४ रोजी पुन्हा सोने ८०० रुपयांनी वाढून ते ४३ हजार ८०० रुपयांवर पोहचले. या सोबतच चांदीचेही भाव सतत वाढतच गेले. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार, १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. २५ फेब्रुवारीपर्यंत ती ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.अशा प्रकारे एकदम मोठी वाढ झाल्याने भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. हे भाव अतिउच्चांकीवर पोहचल्याने त्यात मंगळवारी काहीसी नरमाई आली. भाव वाढल्याने अनेकांचा सोन्याच्या मोडकडे कल वाढल्याने त्यासाठी गर्दीदेखील झाली.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव. 

टॅग्स :Jalgaonजळगाव