शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्पदंश झालेल्या दोघांना मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:19 IST

विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजळगाव जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचारदोन दिवस दिली मृत्यूशी झूंजजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केले तत्काळ उपचार

जळगाव : विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.चोपडा तालुक्यातील गौºयापाडा येथील उन्मेष जगदीश बारेला (११) हा मुलगा मंगळवार, २४ रोजी सकाळी शौचास गेला असता त्याठिकाणी त्याला सापाने दंश केला. त्या वेळी या मुलाने घरी येऊन सर्पदंश झाल्याचे सांगितले. दंश करणारा साप विषारी असल्याने या मुलाची प्रकृती खालावत चालल्याने त्याला बेशुद्धावस्थेत चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याला जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बेशुद्धावस्थेत आलेल्या उन्मेषची दोन दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती.दुसºया एका घटनेत पाचोरा येथील कमल रमेश डोंगरे (४५) या महिलेला सोमवार, २३ रोजी रात्रीच्या वेळी घरी झोपेतच सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालयात हलिवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनादेखील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या ठिकाणी दोघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार व त्यांच्या सहकाºयांनी शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

टॅग्स :Jalgaonजळगावhospitalहॉस्पिटल