शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘गिरणा’च्या आवर्तनाला यंदा कात्री लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 16:47 IST

कमी पावसाचा परिणाम : आमदारांच्या उपोषणानंतरही पाणी सोडण्याची चिन्हे नाहीत

ठळक मुद्देधरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबूनआमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाहीजेमतेम दोन आवर्तने शक्य

जळगाव : गिरणा धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्'ातील टंचाईच्या परिस्थितीमुळे पिण्यासाठीचे आरक्षण वाढणार असून जेमतेम दोन आवर्तने रब्बी व त्यानंतर उन्हाळी पिकांना दिले जाण्याचे संकेत आहेत. यावर्षी जिल्'ात जेमतेम ७० टक्के पाऊस झाला. काही तालुक्यात सरासरी ५० ते ६० टक्क्याच्या जवळपास पाऊस झाला. त्यामुळे यंदा टंचाईच्या झळा लवकर बसण्याची शक्यता आहे. आमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाही पारोळा-एरंडोल विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गिरणाचे पाणी पारोळा व एरंडोल तालुक्यातील टंचाईच्या गावांना मिळावे म्हणून अनेर व बोरी प्रकल्पात पाणी सोडावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आले होते. त्यांनी १५ आॅक्टोबरनंतर पाणी सोडणार असे आश्वासन दिले होते. मात्र १४ आॅक्टोबर उजाडला तरी अद्याप पाणी सोडण्याबाबतचे अद्यापही निर्देश नाहीत. पाणीवाटप समिती बैठक१६आॅक्टोबरलाहोणारका? जलसंपदामंत्री गिरीशमहाजन यांनीडॉ.सतीशपाटीलयांचेउपोषणसोडल्यानंतरतेम्हणालेहोतेकी, शासन निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा असल्याने त्यापूर्वी टंचाई घोषीत करता येत नाही. त्यामुळेच १६ आॅक्टोबरला पाणीवाटप समितीची व त्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. या समितीसमोर पारोळा शहर व तालुक्यातील स्थिती मांडण्यातयेईल.मात्रअद्यापहीपाणीवाटपसमितीचीबैठकआयोजितकेलेलीनाही. जेमतेम दोन आवर्तने शक्य जिल्'ातील यंदाची टंचाईची स्थिती लक्षात घेता यावर्षी जेमतेम दोन वेळा गिरणाधरणावरून आवर्तन दिले जाण्याची शक्यता आहे. शेवटी शेवटी एक आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी दिले जाईल. आरक्षणाबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकहोईल.त्यात हे ठरेल. गिरणा धरण ठरणार वरदान गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे हे धरण आतापर्यंत जवळपास ८० टक्के भरलेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा दहा टक्क्याने कमी असला तरी सध्याच्या पाणी साठ्यातून अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. धरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून या प्रकल्पावर जिल्'ातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा व जळगाव तालक्यातील तसेच याच नदी लगतच्या पांझणनदीवर मालेगाव, चाळीसगाव, भडगाव व धुळे असे सर्व मिळून ६९ हजार ३५१ हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना या धरणावरून पाणी मिळत असते. त्यामुळे नदीवरील पाणी आरक्षणाबाबत नेहमीच उत्सुकता असते.