शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गिरणा धरणाची सलग दुसऱ्या वर्षी शतकी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:52 IST

1969 मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची तहान भागविणारे गिरणा धरण बुधवारी 100 टक्के भरले असून सलग दुसऱ्या वर्षी गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. 1969मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीनही मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढून वाघूर धरण यापूर्वीच 4 सप्टेंबर रोजी 100 टक्के भरले आहे. तसेच हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी साठा वाढून दररोज धरणाचे दरवाजे उघडले जात आहे. वाघूर धरण शंभर टक्के भरल्यानंतर आता गिरणा धरणही शंभर टक्के भरल्याने जिल्ह्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. 

दरम्यान, गिरणा धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाणी सोडण्याच्या विचार सुरू होता मात्र आता धरण क्षेत्रात पाऊस थांबल्याने तूर्त धरणाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा व इतर भागात पाऊस झाल्यास व धरणात वाढीव पाणी येऊ लागल्यास धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागतील अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली. सध्या दरवाजे उघडले नसले तरी नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

योगायोग 

गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2019 रोजी गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर यंदाही 16 सप्टेंबर रोजी हे धरण पूर्ण भरले आहे. 

दृष्टिक्षेपात गिरणा धरण

- स्थळ - नांदगाव पासून वीस किलोमीटर वर - उभारणी - 1969 (1955 मध्ये बांधकामाला सुरुवात व 1969 मध्ये पूर्ण) -साठा - 21, 500 दशलक्ष घनफूट - सध्याची स्थिती - 100 टक्के भरले - जिल्ह्यातील लाभ क्षेत्र - 70 हजार हेक्‍टर -लाभ - जिल्ह्यातील 175 गावे - धरणाची शंभरी - 51 वर्षात 10 वेळा  

गिरणा धरणाची आतापर्यंतची शंभरी 

6 ऑक्टोबर 1973 26 सप्टेंबर 1976 29 सप्टेंबर 1980 11 ऑक्‍टोबर 1994 6 ऑक्टोबर 2004 2 ऑगस्ट 2005 23 सप्टेंबर 2006 15 सप्टेंबर 2007 17 सप्टेंबर 2019 16 सप्टेंबर 2020

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी