शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

गिरणा धरणाची सलग दुसऱ्या वर्षी शतकी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:52 IST

1969 मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची तहान भागविणारे गिरणा धरण बुधवारी 100 टक्के भरले असून सलग दुसऱ्या वर्षी गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. 1969मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीनही मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढून वाघूर धरण यापूर्वीच 4 सप्टेंबर रोजी 100 टक्के भरले आहे. तसेच हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी साठा वाढून दररोज धरणाचे दरवाजे उघडले जात आहे. वाघूर धरण शंभर टक्के भरल्यानंतर आता गिरणा धरणही शंभर टक्के भरल्याने जिल्ह्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. 

दरम्यान, गिरणा धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाणी सोडण्याच्या विचार सुरू होता मात्र आता धरण क्षेत्रात पाऊस थांबल्याने तूर्त धरणाचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा व इतर भागात पाऊस झाल्यास व धरणात वाढीव पाणी येऊ लागल्यास धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागतील अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी दिली. सध्या दरवाजे उघडले नसले तरी नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

योगायोग 

गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2019 रोजी गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर यंदाही 16 सप्टेंबर रोजी हे धरण पूर्ण भरले आहे. 

दृष्टिक्षेपात गिरणा धरण

- स्थळ - नांदगाव पासून वीस किलोमीटर वर - उभारणी - 1969 (1955 मध्ये बांधकामाला सुरुवात व 1969 मध्ये पूर्ण) -साठा - 21, 500 दशलक्ष घनफूट - सध्याची स्थिती - 100 टक्के भरले - जिल्ह्यातील लाभ क्षेत्र - 70 हजार हेक्‍टर -लाभ - जिल्ह्यातील 175 गावे - धरणाची शंभरी - 51 वर्षात 10 वेळा  

गिरणा धरणाची आतापर्यंतची शंभरी 

6 ऑक्टोबर 1973 26 सप्टेंबर 1976 29 सप्टेंबर 1980 11 ऑक्‍टोबर 1994 6 ऑक्टोबर 2004 2 ऑगस्ट 2005 23 सप्टेंबर 2006 15 सप्टेंबर 2007 17 सप्टेंबर 2019 16 सप्टेंबर 2020

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी