शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुलींनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा व अग्नीडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 15:03 IST

पातोंडा येथील आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठ मुलींनी खांदा व अग्नीडाग देवून हा पारंपारिक समज खोटा ठरवला असल्याचे उदाहरण समोर आले आहे.

ठळक मुद्देआठ मुलींनी समाजासमोर समतेचा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हतारपणाच्या काठीचा आधार म्हणजे मुलगा, असा सर्वसाधारण समज जनमानसात आहे. त्यामुळे काही नसले तरी मृत्यूनंतर खांदा द्यायला अन मुखाग्नी द्यायला तरी मुलगा हवाच हा सामान्य माणसाचा आजही समज आहे. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठ मुलींनी खांदा व अग्नीडाग देवून हा पारंपारिक समज खोटा ठरवला असल्याचे दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे. या घटनेने ‘त्या’ आठ मुलींनी समाजासमोर समतेचा संदेश दिला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामसेवक निंबा झिपरु माळी यांच्या पत्नी गं. भा. भिमाबाई निंबा माळी यांचे १० रोजी रात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आठ मुली, जावई व नातवंडे असा परिवार होता.

त्यांच्या नशिबी मुलगा नव्हता. भिमाआईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या आठही मुलींचे शिक्षणदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी कुठलीही कसर त्यांनी सोडली नाही. आठही मुली आपल्या संसारात सुखी आहेत. शालिनी चौधरी, अनिता माळी, मंगल रोकडे, प्रतिभा महाजन, शोभा माळी, अन्नपुर्णा बोरसे, संगीता माळी, उर्मिला माळी या आठ मुलींनी बुधवारी दुपारी आई भिमाबाई माळी यांच्या पार्थिवाला खांदा व अग्निडाग दिला.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावDeathमृत्यू