शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

‘त्या’ मुलींनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा व अग्नीडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 15:03 IST

पातोंडा येथील आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठ मुलींनी खांदा व अग्नीडाग देवून हा पारंपारिक समज खोटा ठरवला असल्याचे उदाहरण समोर आले आहे.

ठळक मुद्देआठ मुलींनी समाजासमोर समतेचा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हतारपणाच्या काठीचा आधार म्हणजे मुलगा, असा सर्वसाधारण समज जनमानसात आहे. त्यामुळे काही नसले तरी मृत्यूनंतर खांदा द्यायला अन मुखाग्नी द्यायला तरी मुलगा हवाच हा सामान्य माणसाचा आजही समज आहे. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठ मुलींनी खांदा व अग्नीडाग देवून हा पारंपारिक समज खोटा ठरवला असल्याचे दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे. या घटनेने ‘त्या’ आठ मुलींनी समाजासमोर समतेचा संदेश दिला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामसेवक निंबा झिपरु माळी यांच्या पत्नी गं. भा. भिमाबाई निंबा माळी यांचे १० रोजी रात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आठ मुली, जावई व नातवंडे असा परिवार होता.

त्यांच्या नशिबी मुलगा नव्हता. भिमाआईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या आठही मुलींचे शिक्षणदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी कुठलीही कसर त्यांनी सोडली नाही. आठही मुली आपल्या संसारात सुखी आहेत. शालिनी चौधरी, अनिता माळी, मंगल रोकडे, प्रतिभा महाजन, शोभा माळी, अन्नपुर्णा बोरसे, संगीता माळी, उर्मिला माळी या आठ मुलींनी बुधवारी दुपारी आई भिमाबाई माळी यांच्या पार्थिवाला खांदा व अग्निडाग दिला.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावDeathमृत्यू