शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरातून बंडखोराने निवडून येऊन दाखवावे - गिरीश महाजन यांचे आव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:28 IST

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे ...

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे घेतले जातील, असे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात करीत शेतकरी कर्जमाफीबाबत भाजप व शिवसेना यांची भूमिका वेगळी असल्याचे बोलून दाखविले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. मुक्ताईनगरातून शिवसेना बंडखोर उमेदवाराने निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांची गुुरुवारी दुपारी जळगाव येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष तथा जळगाव शहर मतदार संघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार चंदूलाल पटेल, भाजपचे संघटन सचिव विशाल त्रिपाठी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते ज्योतिषाकडे जाऊन आकडे सांगतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर महाजन म्हणाले की, मी कधी ज्योतिषावर विश्वास ठेवला नाही. आम्ही जनतेच्या मनातील ओळखतो, म्हणूनच आम्ही किती जागा येणार हे सांगू शकतो, असे स्पष्ट केले.बंडखोरांवर कारवाई अटळभाजप-शिवसेना युती झाली असली तरी जिल्ह्यात पाच ठिकाणी दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली असून काही ठिकाणी थेट भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून व भाजपच्या नेत्यांचे छायाचित्र वापरून प्रचार केला जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, अधिकृत बंडखोर कोठेच नसतात. बंडखोरांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले.मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार म्हणजे ठरवून केलेली राजकीय खेळी असल्यास तेथे बंडखोर उमेदवाराने निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.कर्जमाफीबाबत वेगळी भूमिकाशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली. राज्यात युतीचेच सरकार असल्याने आता पुन्हा सरकार आल्यावर संपूर्ण कर्जमाफी देणार आहात तर ती आताच का दिली नाही?, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीबाबत त्या वेळी शिवसेना व भाजपची वेगळी भूमिका होती. आताही ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगून टाकले.आघाडी सरकारच्या काळातील पालकमंत्र्यांनी काय केले ?युती सरकारच्या काळात पाच वर्षात जळगाव जिल्ह्याला चार पालकमंत्री दिले असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आम्ही जिल्ह्यात मोठे काम केले आहे. आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना गुलाबराव देवकर यांनी काय केले, ते सांगावे, असा प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव