शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

मुक्ताईनगरातून बंडखोराने निवडून येऊन दाखवावे - गिरीश महाजन यांचे आव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:28 IST

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे ...

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय सरकारतर्फे घेतले जातील, असे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात करीत शेतकरी कर्जमाफीबाबत भाजप व शिवसेना यांची भूमिका वेगळी असल्याचे बोलून दाखविले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. मुक्ताईनगरातून शिवसेना बंडखोर उमेदवाराने निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांची गुुरुवारी दुपारी जळगाव येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष तथा जळगाव शहर मतदार संघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार चंदूलाल पटेल, भाजपचे संघटन सचिव विशाल त्रिपाठी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते ज्योतिषाकडे जाऊन आकडे सांगतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर महाजन म्हणाले की, मी कधी ज्योतिषावर विश्वास ठेवला नाही. आम्ही जनतेच्या मनातील ओळखतो, म्हणूनच आम्ही किती जागा येणार हे सांगू शकतो, असे स्पष्ट केले.बंडखोरांवर कारवाई अटळभाजप-शिवसेना युती झाली असली तरी जिल्ह्यात पाच ठिकाणी दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली असून काही ठिकाणी थेट भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून व भाजपच्या नेत्यांचे छायाचित्र वापरून प्रचार केला जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, अधिकृत बंडखोर कोठेच नसतात. बंडखोरांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले.मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार म्हणजे ठरवून केलेली राजकीय खेळी असल्यास तेथे बंडखोर उमेदवाराने निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.कर्जमाफीबाबत वेगळी भूमिकाशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा केली. राज्यात युतीचेच सरकार असल्याने आता पुन्हा सरकार आल्यावर संपूर्ण कर्जमाफी देणार आहात तर ती आताच का दिली नाही?, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीबाबत त्या वेळी शिवसेना व भाजपची वेगळी भूमिका होती. आताही ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगून टाकले.आघाडी सरकारच्या काळातील पालकमंत्र्यांनी काय केले ?युती सरकारच्या काळात पाच वर्षात जळगाव जिल्ह्याला चार पालकमंत्री दिले असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आम्ही जिल्ह्यात मोठे काम केले आहे. आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना गुलाबराव देवकर यांनी काय केले, ते सांगावे, असा प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव