शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विचारांची सांगड चळवळीतून रुजवा

By admin | Updated: January 12, 2015 13:33 IST

माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला.

 परिसंवादात सूर : चुकीच्या बाबींना सर्मथन नको, सुधारणा करण्याची गरज

धुळे : माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला. 'साम्ययोग साधने'च्या हीरक महोत्सवानिमित्त अग्रवाल विश्राम भवनात 'परिवर्तनवादी पत्रिकांचा संघ-समूह, कसा बनू - चालू शकतो' या विषयावर परिसंवाद झाला. पुण्याच्या सुनीती सु. र., यमाजी मालकर, रमेश ओझा, तर अध्यक्षस्थानी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ उपस्थित होत्या. मालकर म्हणाले, पुरोगामी विचारांना आजही मान्यता आहे. परिवर्तनवादी विचार हे पत्रिकांच्या माध्यमातून मांडले जावेत. ओझा म्हणाले, समाज परिवर्तन आणि व्यवस्थेच्या बदलासाठी पत्रकारिता करावी लागेल व त्यात गांभीर्याचा अभाव दिसतो. तसेच काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. सुनीती सु. र. म्हणाल्या, विचारधारा व मूल्य यांच्यात तडजोड करून चालणार नाही. चळवळींमध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख, सुगंध बरंठ, किरण सक्सेना, माजी आमदार पी.डी. दलाल, डॉ.मु.ब. शहा, रमेश दाणे, श्रावण शिंदे, विलास चव्हाण, पापालाल पवार आदी उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे जुनी मूल्य-व्यवस्था मागे पडत आहे. आज पैशालाच अधिक महत्त्व दिले जात आहे. सर्वत्र प्रबोधनापेक्षा मनोरंजनावर अधिक लक्ष दिले जात आहे. चुकांचे सर्मथन करण्यापेक्षा ते सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. माणूसपण, माणुसकी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी भूमिका विद्या बाळ यांनी स्पष्ट केली.