शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

‘अजिंठ्या’चा लाभ हॉटेल व्यवसायाला मिळावा - जळगावातील हॉटेल व्यावसायिकांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:18 IST

पर्यटन, विमानतळ व रेल्वे विभागाने पुढाकार घेण्याची एकमुखी मागणी

जळगाव : जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेणीविषयीची माहिती जळगाव रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यासह पर्यटनाच्यादृष्टीने शहरात सुविधा उपलब्ध करून दिल्या व दळणवळणाची पुरेशी सोय झाल्यास हॉटेल व्यवसायात मोठी भरभराट येईल, असा विश्वास शहर व परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला. या सोबतच हॉटेलच्या वेळेबाबत निश्चित धोरण ठरविणे, हॉटेलमध्ये येणाऱ्यांच्या ओळखपत्राविषयी सुटसुटीत नियम करण्यासंदर्भात उपाययोजना करणेही गरजेचे आहे, असा सूरदेखील या वेळी व्यावसायिकांकडून उमटला.‘लोकमत’च्यावतीने गुरुवारी शहर कार्यालयात हॉटेल व्यावसायिकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना येणाºया अडीअडचणी, त्यांचे विविध प्रश्न, व्यवसाय वृद्धीसाठी काय केले जावे, या विषयी सविस्तर चर्चा झाली.चर्चासत्रास हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष लेखराज उपाध्याय, भागवत भंगाळे, प्रदीप अहुजा, भगत बालाणी, अशोक जोशी, जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील, लक्ष्मीनारायण उपाध्याय, महेश व्यास, सुमीत सोनवणे, निर्मल अरोरा, अमोल साळी, मनोज महाजन, विजय चौधरी, प्रदीप जाधव, संदीप ढंडोरे, गोपाल चव्हाण, विजय पाटील आदी उपस्थित होते.या वेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.अजिंठा लेणीचा फलक असावाजगप्रसिद्ध अजिंठा लेणी हे पर्यटन स्थळ जळगावपासून अवघ्या ५५ कि.मी. अंतरावर असल्याने त्याचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे या वेळी हॉटेल व्यावसायिक म्हणाले. तसे पाहता ४० वर्षांपूर्वी पर्यटक मार्गदर्शन कार्यालय (टुरीस्ट आॅफिस) जळगावात होते. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर अजिंठा लेणीला जाण्यासाठी या स्थानकावर उतरण्याविषयीचे फलकदेखील होते. मात्र आता हे काहीच नसल्याने पर्यटक जळगावकडे फिरकत नसल्याचा मुद्दा या वेळी मांडण्यात आला. इतकेच नव्हे तर इंटरनेटवरदेखील माहिती शोधताना जळगावपासून अजिंठा लेणी जवळ आहे, याविषयी कोठेच उल्लेख नाही. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटक इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार लेणीपर्यंत पोहचतात. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या इतक्या जवळ असूनदेखील जळगावला कोणताही लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामध्ये पाचोरा रेल्वे स्थानकावर अजिंठा लेणीला जाण्याविषयीचा फलक लावण्यात आला आहे. मात्र तेथे उतरल्यास पाचोºयात खाद्य असो की इतर कोणत्याही सुविधा पर्यटकांना मिळत नाही व वाहनांचीदेखील सोय नसल्याने पर्यटकांचे हाल होता. या सर्वांचा विचार केला आणि जळगावात पर्यटक येण्यासाठी प्रयत्न झाले तर ते पर्यटकांनाही सोयीचे होऊन येथील व्यवसाय वाढीसही चालना मिळेल, असा सूर यावेळी उमटला.विमानसेवेमुळे पर्यटक वाढतीलजळगावात नियमित विमानसेवा सुरू केल्यास विदेशी पर्यटकांसाठी ते सोयीचे होऊन मुंबईसह देशातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळावरून पर्यटक अजिंठा लेणीत जाण्यासाठी जळगावात येतील व त्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय वाढीस चालना मिळेल, असेही या वेळी सुचविण्यात आले.धार्मिक, पर्यटनस्थळांचा विकास व्हावाऔरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांमुळे पर्यटक औरंगाबादला येऊन तेथून अजिंठा लेणीत जातात. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील मनूदेवी, पद्मालय व इतर धार्मिक तसेच पर्यटन स्थळांचा विकास केल्यास येथे पर्यटकांचा ओघ वाढू शकेल, त्यासाठी या स्थळांचा विकास व्हावा, अशी मागणी करण्यात आली.बंदची निश्चित वेळ ठरवाहॉटेल बंद करण्यासंदर्भात रात्री ११ वाजेची वेळ ठरविण्यात आली आहे. मात्र ही वेळ ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्याची आहे की, हॉटेल बंद करण्याची आहे, या बाबत संभ्रम आहे. त्यामुळे ११ वाजता ग्राहकांना जेवणासाठी हॉटेलमध्ये प्रवेश दिल्यास ते जेवण करीत असताना बंद करण्याबाबत पोलिसांकडून आग्रह होऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. अनेक जण रात्री वेळ झाल्यास जेवायला आले तर त्यांच्या सोयीसाठी रात्री १२ वाजता हॉटेल बंद करण्यात याव्या, अशीही मागणी केली.काही हॉटेलना मुभा असावीप्रवासी रात्री रेल्वे अथवा इतर वाहनांनी शहरात आले तर त्यांना जेवण मिळावे, यासाठी शहरात काही ठिकाणी रात्री हॉटेल सुरू ठेवल्यास प्रवाशांंसाठी ती मोठी सोय होईल, असेही या वेळी सूचविण्यात आले.ओळखपत्राबाबत दबावतंत्र नसावेहॉटेल, लॉजवर पती-पत्नी आले तर त्यांच्यापैकी पत्नीच्या ओळखपत्रात माहेरचे नाव असल्यास त्यावरून व्यावसायिकांना पोलिसांकडून विचारणा केली जाते. या सोबतच हॉटेलमध्ये येणारे जोडपे प्रौढ (अ‍ॅडल्ट) असल्यास त्यांच्याबाबत हॉटेल व्यावसायिकांवर दबावतंत्र आणणे, त्यांच्या खोलीमध्ये जाऊन विचारणा करणे हे प्रकार चुकीचे असून त्याला आळा बसावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. एकीकडे सर्वोच्च न्यायालय ‘लिव्ह ईन रिलेशनशीप’ची परवानगी देते आणि पोलीस हॉटेलमध्ये येणाºया प्रौढ जोडप्यांबाबत वेठीस धरते, हा पोलिसांचा कुठला न्याय आहे, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. इतकेच नव्हे तर ओळखपत्राच्या प्रती वर्षभर सांभाळणेही कठीण असल्याने ही मर्यादा कमी करण्याची मागणी करण्यात आली. किंवा संगणकीकृत नोंदींना प्रमाण मानावे.ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांना त्रासशहरात ट्रॅव्हल्सने येणाºया प्रवाशांना शहराबाहेर सोडल्याने त्यांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी या प्रवाशांना रेल्वेस्थानक परिसरात अथवा शहरात आणून सोडले तर हॉटेल व्यवसाय वाढीस चांगला वाव असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या सर्व प्रश्नांबाबत ‘लोकमत’ पाठपुरावा करणार असून पर्यटन वाढीसाठीही पुढाकार घेईल, अशी ग्वाही या वेळी मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव