शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

गीतरामायण हे जीवनात धैर्य निर्माण करणारे - कवी आनंद माडगूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:30 IST

‘गदिमां’ची प्रतिमा रसिकांच्या मनात ठासून

जळगाव : गदिमा लिखित गीतरामायण हे मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधणारे तसेच संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव कवी व गायक आनंद माडगूळकर यांनी केले.रविवारी सायंकाळी शहरात आयोजित अग्निहोत्र कार्यक्रमासाठी ते शहरात आले होते. कार्यक्रमानंतर ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी झालेला हा प्रश्नोत्तररुपी संवादप्रश्न : गीतरामायणाच्या प्रयोगांना कधी सुरुवात केलीत?उत्तर : गदिमांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार प्रयोग सादर केले आहेत.प्रश्न : आताच्या तरुण पिढीने गदिमांना पाहिले नाही. मात्र ते आपल्या कार्याच्या रूपाने त्यांना अनुभवतात, काय सांगाल ?उत्तर : गदिमांनी श्रीरामांचे जीवन गीतरामायणाच्या माध्यमातून तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविले. म्हणूच त्यांची प्रतिमा मराठी रसिकांच्या मनात आजही ठासून भरलेली आहे. गदिमांचे कार्य तरुणांना आदर्श घेण्यासारखे निश्चित आहे.प्रश्न : पुण्यात गदिमांचे स्मारक उभारण्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही, याबाबत आपले मत काय?उत्तर : कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरीदेखील याबाबतचा निर्णय प्रलंबित राहत आहे. केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासने दिली जातात. याची खंत वाटते. हा निर्णय लवकर व्हावा. याबरोबरच अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात गदिमांचा जागा कायम आहे. केवळ स्मारकापुरते ते मर्यादित अथवा संकुचित नाहीत, हेही आवर्जून सांगावेसे वाटते.प्रश्न : सामान्य माणसासाठी गदिमांना सोप्या भाषेत कसे समजवाल?उत्तर : गदिमा म्हणजे देशभरातील उन्नत अशा काव्यविचारांना एकत्र करून एक सर्वसामान्यांना पचेल व रुचेल असे काव्यरसायन. सामान्यांच्या भाषेत समजावणारा कवी. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा मराठीतील वाल्मिकी. स्वत: ऋषितुल्य जीवन जगून समाजापुढे श्रीरामांचे आदर्श जीवन उलगडणारे अद्भुत असे रसायन म्हणजे गदिमा होत.प्रश्न : गीतरामायणातून आजच्या तरुण पिढीने काय आदर्श घ्यावा?उत्तर : गदिमांनी गीतरामायणातून श्रीरामांच्या अनेक गुणांचे वर्णन केले आहे. बाल्य, तरुण, प्रौढ, यौद्धा, कोमलहृदयी पण तितकाच कठोर अशी अनेकविध गुणदर्शने आहेत. आजच्या तरुणांनी प्रभू रामचंद्रांच्या आदर्श जीवनातला एक जरी गुण अंगीकारून सातत्याने त्याचे आचरण केले तरीदेखील तरुण नैराश्येतून मुक्त होतील, याची मला खात्री आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव