शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गझल ही वृत्ती जोपासली जावो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:24 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये कवयित्री योगिता पाटील यांच्या कवितेविषयी, गझलविषयी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अस्मिता गुरव यांनी घेतलेला आढावा.

कविता हा प्रकार जितका दिसतो आणि वाटतो तितका सहज सोपा नाही. कविता लिहिण्याची हौस असली तरी लिहिणा:या प्रत्येकाला ती जमेलच असे नाही. चूकपणे सापडेलच असे नाही, कविता ही तारेवरच्या कसरतीसारखी आहे. ज्याला साधली त्यालाच त्यातलं कठीण काय आहे ते कळतं. एरवी सोपी वाटते म्हणून लिहायला गेलं तर कविता फसते-फसवते. गझल हाही त्यातलाच प्रकार. गझल तांत्रिक आहे, ती कार्यशाळेत शिकून लिहिता येते, असं म्हणणा:यांना अक्षर-गण-मात्रा आणि वृत्त याबद्दलचे तंत्र सांगता येईल पण तेवढं येणं म्हणजे गझल नाही कारण कविता असो की गझल त्यात ‘भाव’ नसेल तर ती भावत नाही. कविता आणि गझल ही वृत्ती आहे. ज्याची विचार, भावना तरल आहे त्याला निरीक्षणाची जोड आहे जगण्याकडे आणि दु:खाकडे जिंदादिलीने पाहण्याची वृत्ती आहे त्याच्याच कवितेत, गझलेत अर्थपूर्णता दिसून येते. योगिता पाटील हे खान्देशातील एक नव्याने लिहिणा:यांमधील चांगले नाव. योगिताची कविता आणि गझल अर्थपूर्ण, सामाजिक जाण आणि भान असलेली आहे कारण जगण्याकडे संवेदनशीलतेने बघण्याची वृत्ती ही त्यांच्या लेखनात दिसते म्हणून त्यांची गझल ही मनाला भिडते आणि रसिकांची दाद घेऊन जाते. योगिताचा शिक्षकी पेशा. वाचनाची आवड. सुरेश भटांची गझल वाचता वाचता गझल वाचणं आणि आपले विचार, भावना त्या फॉर्ममध्ये लिहून पाहू म्हणून त्यांनी जे लिहिलं त्याचं कौतुक होत गेलं. जाणकारांनी त्यातील त्रुटी समजावून सांगितल्या, त्यातून सुरू झाला गझल प्रकाराचा अभ्यास. ध्यास असला की परिश्रम घ्यायची तयारी असते आणि त्यातून कवी विकसित होत जातो. निरीक्षण आणि अनुभवाकडे सजगतेनं बघण्याच्या सवयींनी कविता सकस होत असते, हे योगिताने व्यवस्थित समजून घेतलं आणि त्यातूनच नामवंतांच्या, समकालीन कवींच्या कविता वाचण्याचा समजून घेण्याचा प्रवास सुरू झाला. या वाटेवर त्यांना खूप काही मिळत गेलं. आपण कविता लिहितो, ती अर्थपूर्ण हवी हा त्यांचा स्वत:शीच संघर्ष होता. कवितेत तडजोड नसते हे सत्य त्यांना केवळ कळलं असं नाही तर त्यातूनच नवे विषय हाताळण्याचा प्रयत्न करावासा वाटायला लागला. वाचनात कविता वाचायची आवड आहे त्यातही गझलची अधिक गोडी. उत्तम गझल कशी जमते, त्यातील बारकावे, त्यातील लय आणि अचूक शद्बरचना यासाठी त्यांनी अनेक गझलकारांच्या रचनांचा अभ्यास तर केलाच पण त्यासंदर्भात जाणकारांशी चर्चा आणि मार्गदर्शनही संपादन करत असल्याने त्यांना गझलची लय सापडली. पुण्यात संपन्न होणा:या ‘गझलरंग’ या कार्यक्रमात त्यांना सहभागासाठी निमंत्रित करण्यात आले. जाहीररीत्या रसिकांसमोर गझल सादरीकरणाचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. पण त्यात त्यांच्या गझलेचं खूप कौतुक झालं आणि त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने त्यांना चांगली गझल, चांगली कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. गेले तीन-चार वर्षे झाले योगिता पाटील यांच्या कविता, गझल या दज्रेदार दिवाळी अंकातून प्रकाशित होत आहेत. आपण करत असलेलं काम हे जबाबदारीने पार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे परिश्रम घेण्याची त्यांची सवय त्यांना नेहमीच यश देत असते. ‘लोकमत’ दिवाळी अंकातील गझल स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी असो की, कवयित्री बहिणाबाईंच्या वाडय़ातल्या कविसंमेलनात कवितेचं सादरीकरण असो प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं. ‘लोकमत’तर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘काव्यऋतू’ या स्पर्धेत यंदाच्या वर्षी योगिता पाटील यांची गझल पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. खान्देशच्या मातीतल्या नवे विचार-नवा आशय घेऊन लेखणी हाती घेतलेल्या योगिता यांच्या हातून दज्रेदार सकस कविता-गझल लिहिल्या जावोत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळोया शुभेच्छा.!!