शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गझल ही वृत्ती जोपासली जावो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:24 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये कवयित्री योगिता पाटील यांच्या कवितेविषयी, गझलविषयी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अस्मिता गुरव यांनी घेतलेला आढावा.

कविता हा प्रकार जितका दिसतो आणि वाटतो तितका सहज सोपा नाही. कविता लिहिण्याची हौस असली तरी लिहिणा:या प्रत्येकाला ती जमेलच असे नाही. चूकपणे सापडेलच असे नाही, कविता ही तारेवरच्या कसरतीसारखी आहे. ज्याला साधली त्यालाच त्यातलं कठीण काय आहे ते कळतं. एरवी सोपी वाटते म्हणून लिहायला गेलं तर कविता फसते-फसवते. गझल हाही त्यातलाच प्रकार. गझल तांत्रिक आहे, ती कार्यशाळेत शिकून लिहिता येते, असं म्हणणा:यांना अक्षर-गण-मात्रा आणि वृत्त याबद्दलचे तंत्र सांगता येईल पण तेवढं येणं म्हणजे गझल नाही कारण कविता असो की गझल त्यात ‘भाव’ नसेल तर ती भावत नाही. कविता आणि गझल ही वृत्ती आहे. ज्याची विचार, भावना तरल आहे त्याला निरीक्षणाची जोड आहे जगण्याकडे आणि दु:खाकडे जिंदादिलीने पाहण्याची वृत्ती आहे त्याच्याच कवितेत, गझलेत अर्थपूर्णता दिसून येते. योगिता पाटील हे खान्देशातील एक नव्याने लिहिणा:यांमधील चांगले नाव. योगिताची कविता आणि गझल अर्थपूर्ण, सामाजिक जाण आणि भान असलेली आहे कारण जगण्याकडे संवेदनशीलतेने बघण्याची वृत्ती ही त्यांच्या लेखनात दिसते म्हणून त्यांची गझल ही मनाला भिडते आणि रसिकांची दाद घेऊन जाते. योगिताचा शिक्षकी पेशा. वाचनाची आवड. सुरेश भटांची गझल वाचता वाचता गझल वाचणं आणि आपले विचार, भावना त्या फॉर्ममध्ये लिहून पाहू म्हणून त्यांनी जे लिहिलं त्याचं कौतुक होत गेलं. जाणकारांनी त्यातील त्रुटी समजावून सांगितल्या, त्यातून सुरू झाला गझल प्रकाराचा अभ्यास. ध्यास असला की परिश्रम घ्यायची तयारी असते आणि त्यातून कवी विकसित होत जातो. निरीक्षण आणि अनुभवाकडे सजगतेनं बघण्याच्या सवयींनी कविता सकस होत असते, हे योगिताने व्यवस्थित समजून घेतलं आणि त्यातूनच नामवंतांच्या, समकालीन कवींच्या कविता वाचण्याचा समजून घेण्याचा प्रवास सुरू झाला. या वाटेवर त्यांना खूप काही मिळत गेलं. आपण कविता लिहितो, ती अर्थपूर्ण हवी हा त्यांचा स्वत:शीच संघर्ष होता. कवितेत तडजोड नसते हे सत्य त्यांना केवळ कळलं असं नाही तर त्यातूनच नवे विषय हाताळण्याचा प्रयत्न करावासा वाटायला लागला. वाचनात कविता वाचायची आवड आहे त्यातही गझलची अधिक गोडी. उत्तम गझल कशी जमते, त्यातील बारकावे, त्यातील लय आणि अचूक शद्बरचना यासाठी त्यांनी अनेक गझलकारांच्या रचनांचा अभ्यास तर केलाच पण त्यासंदर्भात जाणकारांशी चर्चा आणि मार्गदर्शनही संपादन करत असल्याने त्यांना गझलची लय सापडली. पुण्यात संपन्न होणा:या ‘गझलरंग’ या कार्यक्रमात त्यांना सहभागासाठी निमंत्रित करण्यात आले. जाहीररीत्या रसिकांसमोर गझल सादरीकरणाचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. पण त्यात त्यांच्या गझलेचं खूप कौतुक झालं आणि त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने त्यांना चांगली गझल, चांगली कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. गेले तीन-चार वर्षे झाले योगिता पाटील यांच्या कविता, गझल या दज्रेदार दिवाळी अंकातून प्रकाशित होत आहेत. आपण करत असलेलं काम हे जबाबदारीने पार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे परिश्रम घेण्याची त्यांची सवय त्यांना नेहमीच यश देत असते. ‘लोकमत’ दिवाळी अंकातील गझल स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी असो की, कवयित्री बहिणाबाईंच्या वाडय़ातल्या कविसंमेलनात कवितेचं सादरीकरण असो प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं. ‘लोकमत’तर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘काव्यऋतू’ या स्पर्धेत यंदाच्या वर्षी योगिता पाटील यांची गझल पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. खान्देशच्या मातीतल्या नवे विचार-नवा आशय घेऊन लेखणी हाती घेतलेल्या योगिता यांच्या हातून दज्रेदार सकस कविता-गझल लिहिल्या जावोत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळोया शुभेच्छा.!!