शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

खेडगावात गावकीचा 'सेतु, जोडणा-या एका माकडाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:55 IST

श्रध्दा अन् भक्तीची शक्ती : रामाच्या वानरसेनेतील 'वारसाची’ मृत्यूनंतर घडली अशीही सेवा

ठळक मुद्देवानराच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तीन दिवस पाळले सुतकउत्तर कार्यासाठी ग्रामस्थांनी पुढे येत केली ८० हजारावर रक्कम संकलितग्रामस्थांनी वानराची मूर्ती तयार करीत बांधला चौथरावानराच्या मृत्युनंतर निवडणुकीतील मतभेद झाले दूर

संजय हिरे / आॅनलाईन लोकमतखेडगाव, ता.भडगाव, दि.३० : मर्यादा पुरुषोत्तम राम अन् वानरसेनेच्या कथा रामायणात आदर्श बणून राहिल्या आहेत. रावणाच्या लंकेत प्रवेश करतेवेळी सागरात वानरसेनेने रामभक्त हनुमानाच्या जोडीने रामसेतू बांधल्याचे वर्णन आहे. असाच गावकीचा सेतू जोडला जात असल्याचा योग खेडगाव येथे एका वानरराजाच्या मृत्यूच्या निमित्ताने घडुन आला आहे. आजच्या हनुमान जयंत्तीच्या मुहूर्तावर हा श्रध्दा अन् भक्तीचा पार पडणारा सोहळा म्हणुनच विशेष आहे.एक होते माकड. जंगलात पोटापाण्याचे भागेना. म्हणुनच गोष्टीतील आटपाट नगर असलेल्या खेडगावच्या दिशेने ते आपल्या सहकारी वानरांसह अन्नाच्या शोधार्थ निघाले. वाटेत विज तारांच्या रुपात असलेल्या मृत्युच्या पसरलेल्या जाळ्यांचे त्याला भानच राहीले नाही. आपल्यासाठी उड्या मारण्यासाठी झुलाच असल्याचा समजातून त्याने थेट त्यावर उडी घेतली अन् क्षणार्धात ते जमिनीवर निपचीत पडले. सहकारी वानरांनी त्याचे भोवती वेटोळे करीत जणुकाही शोकच प्रकट केला.मृत वानराच्या अंतिम सेवेसाठी जात-पात, आपआपसातील वितुष्ठ विसरुन गाव एक झाले. आपल्याच कुटुंबातील सदस्य गेल्याची भावनेतून गाव मिळून, अंत्यविधी, दुध चढवण्याचा कार्यक्रम, तीन दिवस ग्रामस्थांनी तर दहा दिवस आग्या-खांद्यानी सुतक धरले. आया-बहीणीनी कपाळीचे कुंकू काढले. शुक्रवार ३० रोजी अर्ध्या गावाने केशदान केले. ग्रामस्थांनी ८० हजारावर रक्कम पुढील क्रियाकर्मासाठी संकलित केली. १४ हजाराची वानरराजाची मूर्ती खुलताबाद येथून घडवली. कुणी तांदुळ, कुणी दाळ, कुणी साखर असा उत्तरकायार्चा खर्च पेलला. गावाच्या हमरस्त्यावरील शिवाजीनगरात चौथरा उभारण्यात आला. शनिवार ३१ रोजी हनुमान जयंती. दोनच दिवसापूर्वी रामनवमी साजरी झाली. रामभक्त हनुमान, अंगद शिष्ठाई रामायणात ऐकलीत. हीच भक्तीची शक्ती खेडगाव अनुभवतेय.काळ दोन वर्षापूर्वीचा, गावी पंचायत निवडणुक लागली. काही विघ्नसंतोषी शक्तीनी गावातील समाजासमाजात फुट पाडली. निवडणुका झाल्यात मात्र मतभेद कायम राहिले. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणा-यांचे चार दिशेला चार तोंडे कायम राहीलेत. एवढेच नव्हे तर गावातील हभप भजनी मंडळात उभी फुट पडली. रामाचा दूत म्हणुन आलेल्या वानराच्या मृत्युनंतर हळुहळु चित्र बदलतेय. राम नावाने सागरात दगड तरलेत रामसेतू उभारला गेला. गावकीचा सेतू जोडला जाण्याची शक्ती नक्कीच गावाच्या श्रध्देत, भक्तीत आहे. आपआपसातील वितुष्ठाचा लोप होण्याची ताकद यात आहे. तसा अनुभव येतोय. विज्ञान वादी विचारसरणीच्या नागरिकांना ही अंधश्रध्दा वाटतेय. तर गावाला जोडणारी ही श्रध्दा-भक्ती म्हणुन भाविक मन याकडे आशेने पहात, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान..! चा नारा लावत नक्कीच समाधानी पावतोय.!

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव