शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खेडगावात गावकीचा 'सेतु, जोडणा-या एका माकडाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:55 IST

श्रध्दा अन् भक्तीची शक्ती : रामाच्या वानरसेनेतील 'वारसाची’ मृत्यूनंतर घडली अशीही सेवा

ठळक मुद्देवानराच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तीन दिवस पाळले सुतकउत्तर कार्यासाठी ग्रामस्थांनी पुढे येत केली ८० हजारावर रक्कम संकलितग्रामस्थांनी वानराची मूर्ती तयार करीत बांधला चौथरावानराच्या मृत्युनंतर निवडणुकीतील मतभेद झाले दूर

संजय हिरे / आॅनलाईन लोकमतखेडगाव, ता.भडगाव, दि.३० : मर्यादा पुरुषोत्तम राम अन् वानरसेनेच्या कथा रामायणात आदर्श बणून राहिल्या आहेत. रावणाच्या लंकेत प्रवेश करतेवेळी सागरात वानरसेनेने रामभक्त हनुमानाच्या जोडीने रामसेतू बांधल्याचे वर्णन आहे. असाच गावकीचा सेतू जोडला जात असल्याचा योग खेडगाव येथे एका वानरराजाच्या मृत्यूच्या निमित्ताने घडुन आला आहे. आजच्या हनुमान जयंत्तीच्या मुहूर्तावर हा श्रध्दा अन् भक्तीचा पार पडणारा सोहळा म्हणुनच विशेष आहे.एक होते माकड. जंगलात पोटापाण्याचे भागेना. म्हणुनच गोष्टीतील आटपाट नगर असलेल्या खेडगावच्या दिशेने ते आपल्या सहकारी वानरांसह अन्नाच्या शोधार्थ निघाले. वाटेत विज तारांच्या रुपात असलेल्या मृत्युच्या पसरलेल्या जाळ्यांचे त्याला भानच राहीले नाही. आपल्यासाठी उड्या मारण्यासाठी झुलाच असल्याचा समजातून त्याने थेट त्यावर उडी घेतली अन् क्षणार्धात ते जमिनीवर निपचीत पडले. सहकारी वानरांनी त्याचे भोवती वेटोळे करीत जणुकाही शोकच प्रकट केला.मृत वानराच्या अंतिम सेवेसाठी जात-पात, आपआपसातील वितुष्ठ विसरुन गाव एक झाले. आपल्याच कुटुंबातील सदस्य गेल्याची भावनेतून गाव मिळून, अंत्यविधी, दुध चढवण्याचा कार्यक्रम, तीन दिवस ग्रामस्थांनी तर दहा दिवस आग्या-खांद्यानी सुतक धरले. आया-बहीणीनी कपाळीचे कुंकू काढले. शुक्रवार ३० रोजी अर्ध्या गावाने केशदान केले. ग्रामस्थांनी ८० हजारावर रक्कम पुढील क्रियाकर्मासाठी संकलित केली. १४ हजाराची वानरराजाची मूर्ती खुलताबाद येथून घडवली. कुणी तांदुळ, कुणी दाळ, कुणी साखर असा उत्तरकायार्चा खर्च पेलला. गावाच्या हमरस्त्यावरील शिवाजीनगरात चौथरा उभारण्यात आला. शनिवार ३१ रोजी हनुमान जयंती. दोनच दिवसापूर्वी रामनवमी साजरी झाली. रामभक्त हनुमान, अंगद शिष्ठाई रामायणात ऐकलीत. हीच भक्तीची शक्ती खेडगाव अनुभवतेय.काळ दोन वर्षापूर्वीचा, गावी पंचायत निवडणुक लागली. काही विघ्नसंतोषी शक्तीनी गावातील समाजासमाजात फुट पाडली. निवडणुका झाल्यात मात्र मतभेद कायम राहिले. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणा-यांचे चार दिशेला चार तोंडे कायम राहीलेत. एवढेच नव्हे तर गावातील हभप भजनी मंडळात उभी फुट पडली. रामाचा दूत म्हणुन आलेल्या वानराच्या मृत्युनंतर हळुहळु चित्र बदलतेय. राम नावाने सागरात दगड तरलेत रामसेतू उभारला गेला. गावकीचा सेतू जोडला जाण्याची शक्ती नक्कीच गावाच्या श्रध्देत, भक्तीत आहे. आपआपसातील वितुष्ठाचा लोप होण्याची ताकद यात आहे. तसा अनुभव येतोय. विज्ञान वादी विचारसरणीच्या नागरिकांना ही अंधश्रध्दा वाटतेय. तर गावाला जोडणारी ही श्रध्दा-भक्ती म्हणुन भाविक मन याकडे आशेने पहात, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान..! चा नारा लावत नक्कीच समाधानी पावतोय.!

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव