शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खेडगावात गावकीचा 'सेतु, जोडणा-या एका माकडाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:55 IST

श्रध्दा अन् भक्तीची शक्ती : रामाच्या वानरसेनेतील 'वारसाची’ मृत्यूनंतर घडली अशीही सेवा

ठळक मुद्देवानराच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तीन दिवस पाळले सुतकउत्तर कार्यासाठी ग्रामस्थांनी पुढे येत केली ८० हजारावर रक्कम संकलितग्रामस्थांनी वानराची मूर्ती तयार करीत बांधला चौथरावानराच्या मृत्युनंतर निवडणुकीतील मतभेद झाले दूर

संजय हिरे / आॅनलाईन लोकमतखेडगाव, ता.भडगाव, दि.३० : मर्यादा पुरुषोत्तम राम अन् वानरसेनेच्या कथा रामायणात आदर्श बणून राहिल्या आहेत. रावणाच्या लंकेत प्रवेश करतेवेळी सागरात वानरसेनेने रामभक्त हनुमानाच्या जोडीने रामसेतू बांधल्याचे वर्णन आहे. असाच गावकीचा सेतू जोडला जात असल्याचा योग खेडगाव येथे एका वानरराजाच्या मृत्यूच्या निमित्ताने घडुन आला आहे. आजच्या हनुमान जयंत्तीच्या मुहूर्तावर हा श्रध्दा अन् भक्तीचा पार पडणारा सोहळा म्हणुनच विशेष आहे.एक होते माकड. जंगलात पोटापाण्याचे भागेना. म्हणुनच गोष्टीतील आटपाट नगर असलेल्या खेडगावच्या दिशेने ते आपल्या सहकारी वानरांसह अन्नाच्या शोधार्थ निघाले. वाटेत विज तारांच्या रुपात असलेल्या मृत्युच्या पसरलेल्या जाळ्यांचे त्याला भानच राहीले नाही. आपल्यासाठी उड्या मारण्यासाठी झुलाच असल्याचा समजातून त्याने थेट त्यावर उडी घेतली अन् क्षणार्धात ते जमिनीवर निपचीत पडले. सहकारी वानरांनी त्याचे भोवती वेटोळे करीत जणुकाही शोकच प्रकट केला.मृत वानराच्या अंतिम सेवेसाठी जात-पात, आपआपसातील वितुष्ठ विसरुन गाव एक झाले. आपल्याच कुटुंबातील सदस्य गेल्याची भावनेतून गाव मिळून, अंत्यविधी, दुध चढवण्याचा कार्यक्रम, तीन दिवस ग्रामस्थांनी तर दहा दिवस आग्या-खांद्यानी सुतक धरले. आया-बहीणीनी कपाळीचे कुंकू काढले. शुक्रवार ३० रोजी अर्ध्या गावाने केशदान केले. ग्रामस्थांनी ८० हजारावर रक्कम पुढील क्रियाकर्मासाठी संकलित केली. १४ हजाराची वानरराजाची मूर्ती खुलताबाद येथून घडवली. कुणी तांदुळ, कुणी दाळ, कुणी साखर असा उत्तरकायार्चा खर्च पेलला. गावाच्या हमरस्त्यावरील शिवाजीनगरात चौथरा उभारण्यात आला. शनिवार ३१ रोजी हनुमान जयंती. दोनच दिवसापूर्वी रामनवमी साजरी झाली. रामभक्त हनुमान, अंगद शिष्ठाई रामायणात ऐकलीत. हीच भक्तीची शक्ती खेडगाव अनुभवतेय.काळ दोन वर्षापूर्वीचा, गावी पंचायत निवडणुक लागली. काही विघ्नसंतोषी शक्तीनी गावातील समाजासमाजात फुट पाडली. निवडणुका झाल्यात मात्र मतभेद कायम राहिले. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणा-यांचे चार दिशेला चार तोंडे कायम राहीलेत. एवढेच नव्हे तर गावातील हभप भजनी मंडळात उभी फुट पडली. रामाचा दूत म्हणुन आलेल्या वानराच्या मृत्युनंतर हळुहळु चित्र बदलतेय. राम नावाने सागरात दगड तरलेत रामसेतू उभारला गेला. गावकीचा सेतू जोडला जाण्याची शक्ती नक्कीच गावाच्या श्रध्देत, भक्तीत आहे. आपआपसातील वितुष्ठाचा लोप होण्याची ताकद यात आहे. तसा अनुभव येतोय. विज्ञान वादी विचारसरणीच्या नागरिकांना ही अंधश्रध्दा वाटतेय. तर गावाला जोडणारी ही श्रध्दा-भक्ती म्हणुन भाविक मन याकडे आशेने पहात, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान..! चा नारा लावत नक्कीच समाधानी पावतोय.!

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव