शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा"

By अमित महाबळ | Updated: September 30, 2023 21:07 IST

यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले.

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यावर्षी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेल्याचा अंदाज आहे. समारोपाला २० तास लागले. सर्वांच्या सहकार्याने शिस्तबद्धरीत्या मिरवणूक पार पडली असली, तरी शहराच्या एकाच भागात होणारी भाविकांची अमाप गर्दी, गणेश मंडळांची वाढती संख्या, मिरवणुकीला लागणारा वेळ आणि प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा, असे मत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले आहे.

नेहरू चौक ते मेहरूण तलावपर्यंतचा गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ४.८० किमी अंतराचा आहे. या मार्गावर नेहरू चौक ते जुने गावातील महर्षी दधिची चौकापर्यंत मंडळांना सादरीकरणासाठी संधी मिळते. यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. मिरवणूक संपायला २० तास लागले. शेवटचे विसर्जन शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजता झाले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य, विविध संस्था, संघटना व प्रशासन या सर्वांच्या सहकार्यामुळे सर्व सुरळीत पार पडले. त्यासाठी एक महिना तयारी सुरू होती. 

परंतु, विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांची वाढती संख्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार, ठराविक वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचे बंधन लक्षात घेता, सर्वच मंडळांचे समाधान होणे हे आव्हानात्मक बनत चालले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून उपनगरातील गणेश मंडळांची आणखी एक स्वतंत्र मिरवणूक निघाल्यास मंडळांची संख्या विभागून मिरवणूक संपण्यास लागणारा वेळ कमी होईल. उत्तमात उत्तम नियोजन व सादरीकरणातील स्पर्धा वाढेल, सध्या एकाच भागात होणारी भाविकांची गर्दी दोन ठिकाणी विभागली जाईल. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल, यंत्रणांना नियोजन करणे अधिक सोपे होईल, याचा विचार गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू करावा. याविषयी पुढील गणेशोत्सवापूर्वी निर्णय घ्यावा, असे मत सचिन नारळे यांनी व्यक्त केले आहे.उंच मूर्ती नकोत, अडचणी येतात... -गणेश मंडळांनी पुढील वर्षी उंच गणेशमूर्ती घेणे टाळावे. यावर्षी सर्वाधिक उंचीची मूर्ती २४ फुटांची होती. मेहरुण तलावाची खोली लक्षात घेता १५ फुटांपर्यंतचीच मूर्ती उभी सरळ खाली सोडून विसर्जन करता येणे शक्य होते. त्यापेक्षा उंच मूर्ती आडव्या कराव्या लागतात. यामध्ये नकळतपणे अवमान होण्याची शक्यता आहे, याकडेही नारळे यांनी लक्ष वेधले आहे.

५० टक्के महिलांना संधी द्या... -पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळाच्या कार्यकारिणीत ५० टक्के महिलांना संधी देण्यावर मंडळांनी विचार करावा. आता महिला व मुलींचा लक्षणीय सहभाग असलेली केवळ एक ते दोन मंडळे दिसून आली आहेत. ही संख्या वाढायला हवी. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनJalgaonजळगाव