शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सामाजिक बांधिलकी जोपासत गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर निर्माण केला आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 16:22 IST

बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी गणेश मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काढले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे गौरवोद्गारडी.जे., डॉल्बीमुक्त गणेशोत्सवजळगाव उपविभागातील २८ उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीसाचे वितरण

आॅनलाईन लोकमत जळगाव दि,१५: बेटी बचाव बेटी पढाव, शेतकरी आत्महत्या यासह सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध प्रकारचे देखावे, शिस्तबध्द मिरवणूक व निर्माल्य रथ तयार करुन लागलीच केलेली स्वच्छता आदी उपक्रम पाहता शहरातील गणेश मंडळे व पोलिसांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी गणेश मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात काढले.

 पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात रविवारी पोलीस दलाच्यावतीने उपविभागातील २८ उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी, उपमहापौर,गणेश सोनवणे, माजी उपमहापौर करीम सालार, मुकुंद मेटकर आदी उपस्थित होते. मिलिंद केदार यांनी शेरोशायरी करत सूत्रसंचालन केले. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आभार मानले.

डी.जे., डॉल्बीमुक्त गणेशोत्सवजिल्ह्यात यंदा प्रथमच डी.जे. व डॉल्बी मुक्त असा गणेशोत्सव जिल्ह्यात साजरा झाला, त्याचे श्रेय हे गणेश मंडळांचेच असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. जळगाव उपविभागात २७५ मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला, त्यापैकी २८ मंडळांनी उत्कृष्ट काम करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. वाहतूक व गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी व निर्भया पथकाच्या तरुणींनी मोलाचे काम केल्याचे कराळे म्हणाले. यावेळी सचिन सांगळे, करीम सालार, मुकुंद मेटकर, सचिन नारळे, दीपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.