शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 14:56 IST

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून संघर्ष सुरूचकार्यकर्ते कमी अन् नेतेच जास्तगट-तटाच्या राजकारणाचा फटका

जळगाव : कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत.जिल्ह्यात काँग्रेसला मोठा इतिहास आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशनदेखील फैजपूर येथे झाले आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची मात्र जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे.जळगाव महानगरपालिकेत गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून येत नाही. काँग्रेसने सन २००३ मध्ये २४ उमेदवार दिले होते. त्यानंतर झालेल्या २००८ च्या निवडणुकीत २६ तर सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिले होते. तिन्ही निवडणुकीत मात्र काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. या वेळी निवडणुकीत काँग्रेसकडून पदाधिकाºयांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत निर्णय झाला. मात्र एकाही पदाधिकाºयाने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐनवेळी केवळ १७ जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आले.जिल्हा काँग्रेसला जळगावात गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे पक्षाचा मेळावा घेण्यापासून ते पदाधिकारी नियुक्ती या सर्व प्रक्रिया पक्षश्रेष्ठींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.एका गटाला सांभाळत असताना दुसरा गट नाराज होत असल्याने त्याचा फटका पक्षाच्या स्थितीवर होत आहे. एकसंधपणे सर्व नाते कामे करताना दिसत नाही. फक्त बाहेरील कुणी मोठा नेता काँग्रेस भवनात आल्यावर जिल्ह्याच्या कानाकोपºयातील नेते व्यासपीठावर बसण्यासाठी फक्त एकत्र येतात, त्यानंतर फिरकतही नाही.पदाधिकाºयांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेकाँग्रेसचे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी प्रदेशाध्यक्षांनी जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही गटांना प्रदेश कार्यकारिणीवर स्थान दिले. त्यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डी.जी. पाटील, अ‍ॅड. ललिता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश आहे. यासह इतर पदाधिकाºयांनी एकत्र येत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.पक्ष निरीक्षकांनी टेकले हातजळगाव जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी प्रदेशस्तरावरून जिल्हा प्रभारी पाठविण्यात आले. माजी उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार भाई जगताप, आमदार विनायक देशमुख यांनी जिल्हा प्रभारी म्हणून काम पाहिले. काही प्रमाणात या नेत्यांनी शिस्त लावण्याचे कामदेखील केले. मात्र गटबाजीच्या राजकारणाने पोखरलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती सुधारण्यात जिल्हा निरीक्षकांनादेखील यश आले नाही. काँग्रेसच्या मेळाव्यात किंवा कार्यक्रमात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची व्यासपीठावर सर्वाधिक गर्दी असते.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव