शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मैत्री अन् प्रेम...प्रत्यक्ष भेटूनही राहिले दोघांचे स्वप्न अधुरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:55 IST

प्रेम : जळगावचा तरुण आणि कोलकाता येथील तरुणीची अधुरी एक कहाणी

जळगाव : फेसबुकवर ओळख झाली नंतर मैत्री झाली, या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.. पुढे जावून एकत्र संसार व लग्नाच्या आणाभाका घेतल्या...त्यासाठी दोघांनी घर सोडले.. प्रत्यक्ष भेट झाली... मात्र त्यांचे हे स्वप्न क्षणीक राहिले... प्रेमाची कहाणी देखील अधुरीच राहिली... तरुण जळगावला तर तरुणी कोलकाता येथे परतली.या प्रेम कहाणीची सध्या शहरात चर्चा सुरु आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा २१ वर्षाचा सागर (काल्पनिक नाव) हा प्लंबरचे काम करतो. कापड व्यवसाय करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. दोन वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून कोलकाता येथील १९ वर्षीय जयाच्या संपर्कात आला. दोघांची चांगली ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली व या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेमप्रकरण इतके बहरले की, भेटीची उत्सुकता लागली. सागर जळगाव तर जया कोलकाता येथे असल्याने सहज भेटणे शक्य नव्हते. मध्यंतरी एका उत्सवाच्यावेळी भेटीचा दिवस निश्चित केला, परंतु जयाला घरुन बाहेर निघायला कुटुंबाकडून अडचणी आल्या, त्यामुळे तेव्हा भेट होऊ शकली नाही.अजमेरला आले दोघं एकत्रपहिली भेट फिस्कटल्यानंतर सागर कपडे घेण्याच्या नावाखाली ५ आॅक्टोबरला सुरतला गेला. जाण्याआधी त्याने भावाला माहिती दिली. यावेळी सागर व जया फेसबुक कॉलिंग व फोनवर संपर्कात आले होते. तेव्हा सागर याने मी सुरत येथे असल्याचे जयाला सांगितले. त्यावर जया याने तू इतक्या जवळ आलाच आहे, तर अजमेरला (राजस्थान) ये मी पण तेथे येते असे सांगितले, त्यानुसार दोघांनी नियोजन केले आणि ६ आॅक्टोबरला सायंकाळी रेल्वेने अजमेरला पोहचले. दोघाना भेटून प्रचंड आनंद झाला. तेथून दोघांनी प्रार्थनास्थळावर जावून दर्शन घेतले. त्यानंतर एका हॉटेलवर दोघांनी मुक्काम केला. तेथे दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. जया हिने कोलकाता येथे घरी जावू. माझ्या आई, वडीलांना भेटू ते लग्नाला होकार देतील असे सांगितले,अजमेर येथून दोघे जण ९ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे गेले.पोलिसात हरविल्याची नोंददुसरीकडे सागर परत का येत नाही, संपर्क होत नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून हरविल्याची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी तपासासाठी सहायक फौजदार गोपाळ चौधरी व भूषण पाटील यांची नियुक्ती केली. प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे आले.पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करुन या तपासासाठी हवालदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे या दोघांना रामानंद नगर पोलिसांच्या मदतीला दिले. संयुक्त पथकाने केलेल्या तपासात सागर हा कोलकाता येथे असल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार पथकाने तेथून सागरला ताब्यात घेतले.असा झाला प्रेम भंग आणि शेवट....कोलकाता येथे गेल्यावर जया याने सागरला एक दिवस हॉटेलवरच मुक्काम करायला लावला. दुसऱ्या दिवशी जया सागरला घेऊन मावशीकडे गेली. मावशीला लग्नाची कल्पना देण्यात आली. आई, वडीलांना राजी करते सांगून जया हिने काही दिवस सागरला मावशीकडेच थांबायला सांगितले. कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच या मावशीकडे पोलिसांचे पथक धडकले. त्यावेळी जयालाही बोलावण्यात आले. जया कुटुंबाचा होकार मिळविण्यात त्या काळात अपयशी ठरली तर दुसरीकडे सागरला घ्यायला पोलीस आल्याने दोघंही संकटात सापडले. शेवटी दोघांनी भविष्याचा विचार केला, कुटुंबावर बेतणारा प्रसंग, समाजात होणारी बदनामी, पालकांचा विश्वासघात, त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या साºया गोष्टीची दोघांना जाणीव झाली आणि झालं गेलं विसरुन दोघंही आपआपल्या घरी परतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव