शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

भाजपात संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:49 IST

जळगाव पाठोपाठ धुळ्यातही पक्षांतर्गत वाद सुरू

चंद्रशेखर जोशीजळगाव : सत्तेची फळे चाखणाऱ्या भाजपास सत्ता मानवत नसल्याचीच प्रचिती गेल्या काही वर्षांपासून येत आहे. जळगाव पाठोपाठ धुळ्यातही पक्षांतर्गत वाद सुरू आहेत. जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पहाता एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याची ओळख होती. स्व. मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन, अरूणभाई गुजराथी यांच्या सारखे दिग्गज नेते एकेकाळी कॉँग्रेसकडे होते. अरूणभाई गुजराथी हे आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. मात्र हळूहळू उतरती कळा कॉँग्रेसला लागली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रस पक्षाला एकाही जागेवर यश मिळू शकले नाही. या विरूद्ध परिस्थिती भाजपा-शिवसेनेची झाली. नव्वदीच्या दशकात भाजपाने मुसंडी मारली ती नंतर कायम ठेवत एक-एक जागा या पक्षाने आपल्या ताब्यात घेतली. आज जिल्ह्यात या पक्षाचे प्राबल्य असल्याचेच दिसून येते. विधानसभेत सहा आमदार, विधानपरिषदेत दोन आमदार, दोन खासदार, जिल्हा परिषदेत सत्ता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत सत्ता, सहकारातील दूध संघ ताब्यात असे चौफेर यश या पक्षाला मिळालेले आहे. मात्र तीन वर्षापासून पक्षांतर्गत बंडाळीचा उद्रेक अधुन-मधून सुरू असतो. राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात सर्वात अगोदर संधी मिळाली ती पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना. त्यांच्याकडे महसूल, कृषीसह बारा खात्यांची जबाबदारी होती. २०१६ मध्ये मात्र खडसेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून पक्षात दोन गट निर्माण झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील वैर गंभीर वळणावर आहे. पूर्वी एक मेकांना टोमणे मारणे इथपर्यंत हा विषय होता. आता उघडपणे दोघे एकमेकांबद्दल बोलत असतात. कार्यकर्त्यांचीही त्यामुळे विभागणी झाली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जिल्ह्यात आले होते. भुसावळ येथील पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी दानेवेंना धारेवर धरले. जळगावी आल्यावर दानवे काहीसे वैतागात होते. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले... ‘पक्षाचे काय करावे आता तुम्हीच सांगा...’ त्यांचा वैताग उघड जाणवत होता. त्यानंतर दानवे धुळ्यात गेले होते. तेथेही अनिल गोटे व त्यांच्यात वाद झाला. धुळ्याच्या निवडणुकीत भाजपातील वाद, गटबाजी उघडपणे सुरू आहे. गोटेंची मुख्यमंत्र्यांनी समजूत घातली मात्र आता पुन्हा त्यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे. नंदुरबारमध्येही गावीत कुटुंबिय नाराज आहेत. त्यामुळे भाजपात संघर्षाच्या ठिकगी पडल्याचीच प्रचिती येत आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव