शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपात संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:49 IST

जळगाव पाठोपाठ धुळ्यातही पक्षांतर्गत वाद सुरू

चंद्रशेखर जोशीजळगाव : सत्तेची फळे चाखणाऱ्या भाजपास सत्ता मानवत नसल्याचीच प्रचिती गेल्या काही वर्षांपासून येत आहे. जळगाव पाठोपाठ धुळ्यातही पक्षांतर्गत वाद सुरू आहेत. जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पहाता एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याची ओळख होती. स्व. मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन, अरूणभाई गुजराथी यांच्या सारखे दिग्गज नेते एकेकाळी कॉँग्रेसकडे होते. अरूणभाई गुजराथी हे आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. मात्र हळूहळू उतरती कळा कॉँग्रेसला लागली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रस पक्षाला एकाही जागेवर यश मिळू शकले नाही. या विरूद्ध परिस्थिती भाजपा-शिवसेनेची झाली. नव्वदीच्या दशकात भाजपाने मुसंडी मारली ती नंतर कायम ठेवत एक-एक जागा या पक्षाने आपल्या ताब्यात घेतली. आज जिल्ह्यात या पक्षाचे प्राबल्य असल्याचेच दिसून येते. विधानसभेत सहा आमदार, विधानपरिषदेत दोन आमदार, दोन खासदार, जिल्हा परिषदेत सत्ता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत सत्ता, सहकारातील दूध संघ ताब्यात असे चौफेर यश या पक्षाला मिळालेले आहे. मात्र तीन वर्षापासून पक्षांतर्गत बंडाळीचा उद्रेक अधुन-मधून सुरू असतो. राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात सर्वात अगोदर संधी मिळाली ती पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना. त्यांच्याकडे महसूल, कृषीसह बारा खात्यांची जबाबदारी होती. २०१६ मध्ये मात्र खडसेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून पक्षात दोन गट निर्माण झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील वैर गंभीर वळणावर आहे. पूर्वी एक मेकांना टोमणे मारणे इथपर्यंत हा विषय होता. आता उघडपणे दोघे एकमेकांबद्दल बोलत असतात. कार्यकर्त्यांचीही त्यामुळे विभागणी झाली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जिल्ह्यात आले होते. भुसावळ येथील पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी दानेवेंना धारेवर धरले. जळगावी आल्यावर दानवे काहीसे वैतागात होते. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले... ‘पक्षाचे काय करावे आता तुम्हीच सांगा...’ त्यांचा वैताग उघड जाणवत होता. त्यानंतर दानवे धुळ्यात गेले होते. तेथेही अनिल गोटे व त्यांच्यात वाद झाला. धुळ्याच्या निवडणुकीत भाजपातील वाद, गटबाजी उघडपणे सुरू आहे. गोटेंची मुख्यमंत्र्यांनी समजूत घातली मात्र आता पुन्हा त्यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे. नंदुरबारमध्येही गावीत कुटुंबिय नाराज आहेत. त्यामुळे भाजपात संघर्षाच्या ठिकगी पडल्याचीच प्रचिती येत आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव