शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षातील ‘अधुरी एक कहानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:59 IST

भाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे

चंद्रशेखर जोशीभाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली. या निमित्ताने हे सरकार चार वर्षात कसे अपयशी ठरले, याबाबत विरोधी पक्षातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व सत्तेत असलेले पण सतत विरोधात बोलणारा शिवसेना पक्ष सांगत आहे. या विरोधात भाजपाकडून आम्ही चार वर्षात जनतेला कसा न्याय दिला याबाबत भाजपाकडून विविध उपक्रमांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून पटवून सांगितले जात आहे. जिल्ह्याचा विचार करता या चार वर्षात बऱ्याच घडामोडी झाल्या. प्रारंभी जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत मुक्ताईनगरचे आमदार एकनाथराव खडसे यांचा सहभाग झाला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनाही संधी मिळाली. जिल्ह्यातील दोघा आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दीड दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या सहकारातील विविध निवडणुकांमध्ये लक्ष घालून जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघ यासह सहकारातील अन्य संस्थांवर भाजपाचे पॅनल उभे करून या संस्था ताब्यात घेतल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौºयाने जिल्ह्यात जवळपास १८०० कोटी रूपयांच्या रस्ते विकास कामांचा कोनशिला अनावरण कार्यक्रम झाला. पक्षातील अंतर्गत कलह, झालेल्या काही वादग्रस्त व्यवहारांमुळे व आरोपांमुळे एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. येथूनच ठिणगी पडली. सत्ताधारी पक्षात विकास कामांऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. खडसे विरूद्ध गिरीश महाजन असे दोन गट पक्षात पडले. याचे दुरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकास कामांवर झाले आहेत. या चार वर्षात भाजपाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नवीन गठीत नगरपरिषदांवर भाजपाचा झेंडा रोवला. राज्यात, केंद्रात ज्या पक्षाची सत्ता त्या बाजुने मतदारांचा कौल असतो असे म्हणतात. याचे कारण म्हणजे जनतेला अपेक्षा असतात सत्तेचा उपयोग विकासासाठी होईल. राज्यातील केंद्रातील सत्तेमुळे जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेज मिळाले मात्र पायाभूत सुविधांबाबत फारशी कामे होऊ शकली नसल्याचेच लक्षात येते. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्याला निधी मिळणे अपेक्षित होते. ते न झाल्याने जनतेला आज पाणी समस्येला सामोरे जावे लागते आहे. जिल्ह्यातील विरोधकही चार वर्षात फारशे प्रभावी नव्हते. आता एक वर्षात अनुशेष भरला जावा अशा जनतेच्या अपेक्षा आहेत.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव