शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चार वर्षातील ‘अधुरी एक कहानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:59 IST

भाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे

चंद्रशेखर जोशीभाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली. या निमित्ताने हे सरकार चार वर्षात कसे अपयशी ठरले, याबाबत विरोधी पक्षातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व सत्तेत असलेले पण सतत विरोधात बोलणारा शिवसेना पक्ष सांगत आहे. या विरोधात भाजपाकडून आम्ही चार वर्षात जनतेला कसा न्याय दिला याबाबत भाजपाकडून विविध उपक्रमांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून पटवून सांगितले जात आहे. जिल्ह्याचा विचार करता या चार वर्षात बऱ्याच घडामोडी झाल्या. प्रारंभी जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत मुक्ताईनगरचे आमदार एकनाथराव खडसे यांचा सहभाग झाला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनाही संधी मिळाली. जिल्ह्यातील दोघा आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दीड दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या सहकारातील विविध निवडणुकांमध्ये लक्ष घालून जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघ यासह सहकारातील अन्य संस्थांवर भाजपाचे पॅनल उभे करून या संस्था ताब्यात घेतल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौºयाने जिल्ह्यात जवळपास १८०० कोटी रूपयांच्या रस्ते विकास कामांचा कोनशिला अनावरण कार्यक्रम झाला. पक्षातील अंतर्गत कलह, झालेल्या काही वादग्रस्त व्यवहारांमुळे व आरोपांमुळे एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. येथूनच ठिणगी पडली. सत्ताधारी पक्षात विकास कामांऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. खडसे विरूद्ध गिरीश महाजन असे दोन गट पक्षात पडले. याचे दुरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकास कामांवर झाले आहेत. या चार वर्षात भाजपाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नवीन गठीत नगरपरिषदांवर भाजपाचा झेंडा रोवला. राज्यात, केंद्रात ज्या पक्षाची सत्ता त्या बाजुने मतदारांचा कौल असतो असे म्हणतात. याचे कारण म्हणजे जनतेला अपेक्षा असतात सत्तेचा उपयोग विकासासाठी होईल. राज्यातील केंद्रातील सत्तेमुळे जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेज मिळाले मात्र पायाभूत सुविधांबाबत फारशी कामे होऊ शकली नसल्याचेच लक्षात येते. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्याला निधी मिळणे अपेक्षित होते. ते न झाल्याने जनतेला आज पाणी समस्येला सामोरे जावे लागते आहे. जिल्ह्यातील विरोधकही चार वर्षात फारशे प्रभावी नव्हते. आता एक वर्षात अनुशेष भरला जावा अशा जनतेच्या अपेक्षा आहेत.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव