शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

चार वर्षातील ‘अधुरी एक कहानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:59 IST

भाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे

चंद्रशेखर जोशीभाजपा सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली. या निमित्ताने हे सरकार चार वर्षात कसे अपयशी ठरले, याबाबत विरोधी पक्षातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस व सत्तेत असलेले पण सतत विरोधात बोलणारा शिवसेना पक्ष सांगत आहे. या विरोधात भाजपाकडून आम्ही चार वर्षात जनतेला कसा न्याय दिला याबाबत भाजपाकडून विविध उपक्रमांच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून पटवून सांगितले जात आहे. जिल्ह्याचा विचार करता या चार वर्षात बऱ्याच घडामोडी झाल्या. प्रारंभी जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीत मुक्ताईनगरचे आमदार एकनाथराव खडसे यांचा सहभाग झाला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनाही संधी मिळाली. जिल्ह्यातील दोघा आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दीड दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या सहकारातील विविध निवडणुकांमध्ये लक्ष घालून जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघ यासह सहकारातील अन्य संस्थांवर भाजपाचे पॅनल उभे करून या संस्था ताब्यात घेतल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौºयाने जिल्ह्यात जवळपास १८०० कोटी रूपयांच्या रस्ते विकास कामांचा कोनशिला अनावरण कार्यक्रम झाला. पक्षातील अंतर्गत कलह, झालेल्या काही वादग्रस्त व्यवहारांमुळे व आरोपांमुळे एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. येथूनच ठिणगी पडली. सत्ताधारी पक्षात विकास कामांऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. खडसे विरूद्ध गिरीश महाजन असे दोन गट पक्षात पडले. याचे दुरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकास कामांवर झाले आहेत. या चार वर्षात भाजपाने यशाची शिखरे पादाक्रांत केली. पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नवीन गठीत नगरपरिषदांवर भाजपाचा झेंडा रोवला. राज्यात, केंद्रात ज्या पक्षाची सत्ता त्या बाजुने मतदारांचा कौल असतो असे म्हणतात. याचे कारण म्हणजे जनतेला अपेक्षा असतात सत्तेचा उपयोग विकासासाठी होईल. राज्यातील केंद्रातील सत्तेमुळे जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेज मिळाले मात्र पायाभूत सुविधांबाबत फारशी कामे होऊ शकली नसल्याचेच लक्षात येते. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्याला निधी मिळणे अपेक्षित होते. ते न झाल्याने जनतेला आज पाणी समस्येला सामोरे जावे लागते आहे. जिल्ह्यातील विरोधकही चार वर्षात फारशे प्रभावी नव्हते. आता एक वर्षात अनुशेष भरला जावा अशा जनतेच्या अपेक्षा आहेत.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव