शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

दररोज चार हजार ट्रक करतात ये-जा, तरीही उड्डाणपूल नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सर्वात जास्त आणि बेशिस्त रहदारी असलेला चौक म्हणजे अजिंठा चौफुली आहे. मात्र महामार्गाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात सर्वात जास्त आणि बेशिस्त रहदारी असलेला चौक म्हणजे अजिंठा चौफुली आहे. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात उड्डाणपूल करण्याच्या यादीतून नेमका हा चौक वगळण्यात आला. शहरात दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक आणि आता अग्रवाल चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र जेथे सर्वात जास्त गरज आहे. तेथे अजिंठा चौफुलीवरच उड्डाणपूल बनवण्यात येणार नाही. त्याऐवजी तेथे एक सर्कल तयार केले जाणार आहे. मात्र हे अडचणीचे ठरू शकते, असा दावा जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने केला आहे. त्याऐवजी तेथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची मागणी केली जात आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणात खोटे नगर ते कालंका माता मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी उड्डाणपूल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग बनवले जात आहेत. मात्र त्यात मोठी वर्दळ असलेल्या अजिंठा चौफुलीजवळ उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आलेले नाही. जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना या चौकात उड्डाणपूल करण्याच्या मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी दिले होते.

सर्कलला काय आहे अडचण?

काही वेळा शहरातून मोठे ट्रक ये-जा करतात. सर्कल तयार केल्यास त्या मोठ्या ट्रकला वळण घेण्यासाठी या ठिकाणी पुरेशी जागा मिळणार नाही. तसेच दिवसाला ये-जा करणाऱ्या मालवाहू वाहने, तसेच कार, दुचाकी यांची वाढती संख्या पाहिली तर येथे सर्कल सोयीचे होणार नाही.

भविष्यात वाढू शकते रहदारी

सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, अयोध्या नगर येथे सातत्याने रहिवासी भागाचा विस्तार होत आहे. त्यांना हा चौक ओलांडूनच जावे लागते. संपूर्ण औद्योगिक परिसर, तसेच विमानतळाकडे जाण्यासाठी हाच चौक ओलांडावा लागतो. विमानतळावर भविष्यात विमान फेऱ्या वाढू शकतात. तसेच वैमानिक प्रशिक्षण केंद्रदेखील येणार आहे. त्यामुळे या भागातील रहदारी वाढेल, तरी तेथे उड्डाणपुलाची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

कोट - मोठ्या ट्रकला सर्कलमुळे अडचणी येणार आहेत. त्यामुळे तसेच शहरातील विस्तारित भाग, औद्योगिक वसाहत, विमानतळाकडे जाण्यासाठी हा चौक ओलांडावा लागतो. त्यामुळे भविष्यातील वाढती रहदारी पाहता या भागात उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी आम्ही केली आहे. - जसपालसिंह बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा मोटर ओनर्स व ट्रान्सपोर्ट एजंट्स असोसिएशन.

कोट - राष्ट्रीय महामार्गावर बायपास झाल्यानंतर जवळपास ६० टक्के वाहतूक ही शहराच्या बाहेरून जाणार आहे. या रस्त्याच्या आराखड्यात या चौकात सर्कल प्रस्तावित आहे. तरीही सध्या येथे उड्डाणपुलाची वाढलेली मागणी पाहता त्याचाही विचार सुरू आहे. - चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.