शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:14 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश असताना तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाºया उपाययोजनांतर्गत बाजार समित्यांमधील गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी २० मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एका वेळी दहा जणांपेक्षा जास्त जणांना प्रवेश नसावा तसेच टप्प्या-टप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे असताना बाजार समित्यांमध्ये दररोज मोठी गर्दी होते. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालनही होत नसल्याचे समोर आले. हे प्रकार सुरूच असल्याने जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जळगाव बाजार समितीमध्ये भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने पाच व्यापाºयांचे परवानेदेखील रद्द केले. तरीदेखील बाजार समित्यांमध्ये धान्य, भाजीपाला, फळे यांच्या खरेदी व विक्रीसाठी गर्दी कायम होती. त्यामुळे २० मार्च रोजीच्या आदेशाचे व सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने जळगावसह अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी ९ एप्रिल रोजी दिले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस