शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

नशिराबादला ३४२० हेक्टर पिकांना नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 20:28 IST

पंचनामे सादर : शेतकरी राजाला मदतीची अपेक्षा

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद- अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नशिराबादसह परिसरातील शेतातल्या पिकांचे मोठे नुकसान झाले़ त्यानुसार सुमारे ३४२० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामा करण्यात आला आहे. यासंदर्भातला अहवाल शासन दरबारी देण्यात आला असल्याची माहिती तलाठी प्रवीण बेंडाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. रब्बीची पेरणी करण्यासाठी हातात पैसा नाही. आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत. मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या वाद विवाद व आडमुठेपणामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेसाठी संघर्ष करीत आहेत़ मात्र या सर्व घडामोडींमध्ये शेतकरी राजाचा विसर पडला हे मात्र तितकेच खरे़ लवकर सत्ता स्थापन करा आणि शेतक?्यांना दिलासा द्या अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. अवकाळी पावसामुळे नशिराबाद सह परिसरात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ठराविक पिकांची पंचनामे होत असल्याची ओरड शेतकरी वर्ग करीत होता. मात्र नशिराबाद येथे कापूस, उडीद, सोयाबीन, पालेभाज्या ,ज्वारी मका, फळबागा आदी नुकसान बाधित पिकांचे सुमारे ३ हजार ४२० हेक्टर क्षेत्रफळपिकांचे नुकसान पंचनामे करण्यात आली असल्याची माहिती तलाठी बेंडाळे यांनी दिली. नशिराबाद परिसरात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान असल्याचे सांगण्यात येते. ग्राम विकास अधिकारी बी एस पाटील, कृषी सहाय्यक प्रवीण सोनवणे, तलाठी प्रवीण बेंडाळे यांनी पंचनाम्याचे काम केले.पंचनामे झाले भरपाई कधी?खरीप पिकांचे पंचनामे झालेत मात्र नुकसान भरपाई शासन देणार कधी या प्रतीक्षेत शेतकरी आहे. लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव