शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार दशकांची योगसाधना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:32 IST

चाळीसगावचे योगगुरू: कणकसिंग राजपूत यांची योग समर्पित जीवनसफर

चाळीसगाव : गेली चार दशकं कणकसिंग मानसिंग राजपूत हे चाळीसगावच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात योग प्रसारासाठी पायपीट करताहेत. कोणताही मोबदला न घेता विनामूल्य त्यांचे हे 'योग विद्यादान' सुरू असून शेवटच्या श्वासापर्यंत योगसेवा करीत राहू, असे ते आत्मविश्वासाने सांगतात. आजही ७९ वर्षीय कणकसिंग राजपूत दरदिवशी एक तास योग मार्गदर्शन करतात.चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं.विद्यालयात कणकसिंग राजपूत यांनी ३६ वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतरची २१ व त्याधीची १९ अशी ४० वर्ष ते अखंड योगसाधना करीत आहे.धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील शाळांसह संस्था व मंडळांमधील विद्यार्थी व व्यक्तींना त्यांनी योग धडे दिले. सद्य:स्थितीतही योग मार्गदर्शनासाठी कुणीही बोलावले तर त्यांची ना नसते. शालेय सेवेतही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासापाठोपाठ योगाचेही ज्ञानार्जन केले आहे.आणीबाणीमुळे भेटला योग१९७५ मध्ये आणीबाणीत येथील योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांना मिसाबंदी कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात काही योगशिक्षकही अटकेत होते. वसंतराव चंद्रात्रे त्यांच्याकडून ते योग शिकले. पुढे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंद्रात्रे यांनी ना.बं.वाचनालयात योगाचे विनामूल्य क्लास सुरू केले. कणकसिंग राजपूत हे याचं क्लासचे पहिले विद्यार्थी. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे हे त्यांचे योगगुरू. चंद्रात्रे आणि राजपूत या जोडगोळीने चाळीसगावकरांना योगाचीही गोडी लावली. गेल्या ४५ वर्षापासून वसंतराव व त्यांच्या पत्नी मीनाक्षी चंद्रात्रे योगाचे वर्ग घेत आहे. कणकसिंग राजपूत यांनीही याच वाटेवर आपली जीवन सफर सुरू ठेवली आहे. अनेकांच्या मनात आणीबाणीच्या कटू आठवणींचे व्रण आजही आहेत. मात्र आणीबाणीमुळे आम्हाला योग भेटला. असे मिश्किलपणे कणकसिंग राजपूत सांगतात.१५ हजार नागरिकांना योगाची दीक्षाराजपूत यांनी गेल्या ४० वर्षात १५ हजारांहून नागरिकांना योगजीवन दिले आहे. बालशिबिरांमध्येही ते विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाची अष्टांग करून दाखवितात. डॉक्टर्स, पोलीस, संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व प्राध्यापक, शासकीय कर्मचाऱ्यांना राजपूत यांनी योग शिकवला आहे.योगामुळे शरीर सुदृढ राहते. आयुष्यात दुसऱ्यांदा भरपूर गोष्टी मिळतात. मात्र शरीर पुन्हा मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या शरीराला योगाचा 'च्यवनप्राश' रोज दिला पाहिजे, असे मार्गदर्शन कणकसिंग राजपूत करतात.