शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

चार दशकांची योगसाधना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:32 IST

चाळीसगावचे योगगुरू: कणकसिंग राजपूत यांची योग समर्पित जीवनसफर

चाळीसगाव : गेली चार दशकं कणकसिंग मानसिंग राजपूत हे चाळीसगावच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात योग प्रसारासाठी पायपीट करताहेत. कोणताही मोबदला न घेता विनामूल्य त्यांचे हे 'योग विद्यादान' सुरू असून शेवटच्या श्वासापर्यंत योगसेवा करीत राहू, असे ते आत्मविश्वासाने सांगतात. आजही ७९ वर्षीय कणकसिंग राजपूत दरदिवशी एक तास योग मार्गदर्शन करतात.चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं.विद्यालयात कणकसिंग राजपूत यांनी ३६ वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतरची २१ व त्याधीची १९ अशी ४० वर्ष ते अखंड योगसाधना करीत आहे.धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील शाळांसह संस्था व मंडळांमधील विद्यार्थी व व्यक्तींना त्यांनी योग धडे दिले. सद्य:स्थितीतही योग मार्गदर्शनासाठी कुणीही बोलावले तर त्यांची ना नसते. शालेय सेवेतही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासापाठोपाठ योगाचेही ज्ञानार्जन केले आहे.आणीबाणीमुळे भेटला योग१९७५ मध्ये आणीबाणीत येथील योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांना मिसाबंदी कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात काही योगशिक्षकही अटकेत होते. वसंतराव चंद्रात्रे त्यांच्याकडून ते योग शिकले. पुढे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंद्रात्रे यांनी ना.बं.वाचनालयात योगाचे विनामूल्य क्लास सुरू केले. कणकसिंग राजपूत हे याचं क्लासचे पहिले विद्यार्थी. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे हे त्यांचे योगगुरू. चंद्रात्रे आणि राजपूत या जोडगोळीने चाळीसगावकरांना योगाचीही गोडी लावली. गेल्या ४५ वर्षापासून वसंतराव व त्यांच्या पत्नी मीनाक्षी चंद्रात्रे योगाचे वर्ग घेत आहे. कणकसिंग राजपूत यांनीही याच वाटेवर आपली जीवन सफर सुरू ठेवली आहे. अनेकांच्या मनात आणीबाणीच्या कटू आठवणींचे व्रण आजही आहेत. मात्र आणीबाणीमुळे आम्हाला योग भेटला. असे मिश्किलपणे कणकसिंग राजपूत सांगतात.१५ हजार नागरिकांना योगाची दीक्षाराजपूत यांनी गेल्या ४० वर्षात १५ हजारांहून नागरिकांना योगजीवन दिले आहे. बालशिबिरांमध्येही ते विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाची अष्टांग करून दाखवितात. डॉक्टर्स, पोलीस, संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व प्राध्यापक, शासकीय कर्मचाऱ्यांना राजपूत यांनी योग शिकवला आहे.योगामुळे शरीर सुदृढ राहते. आयुष्यात दुसऱ्यांदा भरपूर गोष्टी मिळतात. मात्र शरीर पुन्हा मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या शरीराला योगाचा 'च्यवनप्राश' रोज दिला पाहिजे, असे मार्गदर्शन कणकसिंग राजपूत करतात.