शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जळगावचे चार नगरसेवक अपात्र, घरकुल प्रकरणात शिक्षा भोवली

By सुनील पाटील | Updated: April 13, 2023 17:36 IST

दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही.

जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील गैरप्रकारामुळे शिक्षा झालेले नगरसेवक कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, लता रणजित भोईटे व भगत बालाणी या चार जणांना न्यायालयाने गुरुवारी अपात्र ठरविले. दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही. दरम्यान, आपण नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला असल्याने आपल्याला अपात्र घोषित करु नये असा बालाणी यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.पी.सैय्यद यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

शहरातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात या पाचही नगरसेवकांना पाच वर्षाची शिक्षा झालेली आहे. कायद्यानुसार दोन वर्ष शिक्षा झालेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. पदावर असेल तर त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र या नगरसेवकांनी निवडणूक लढवली. त्यामुळे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी लॉकडाऊनच्या आधी जळगावच्या दिवाणी न्यायालयात चौघांना अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल केली होती.

ॲड.सुधीर कुळकर्णी यांनी प्रशांत नाईक यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. बालाणी यांनी २९ मार्च रोजी राजीनामा दिलेला असला तरी नगरसेवक व गटनेता पदावर असताना अनेक निर्णय घेतलेले आहेत. महापालिकेत त्यांनी कामकाज केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टाळता येणार नसल्याचा युक्तीवाद ॲड.कुळकर्णी यांनी केला होता, त्यावर न्यायालयाने बालाणी यांचा अर्ज फेटाळून लावला होता.घरकुल घोटाळ्यात झालेल्या शिक्षेमुळे नगरसेवक पद जाण्याची शक्यता पाहता चौघांनी शिक्षेच्या निकालाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात केला होता. या न्यायालयाने चारही जणांचा अर्ज फेटाळून लावला होता.

सहा वर्ष निवडणूक लढविण्यास मनाई

न्या. एस.पी.सैय्यद यांनी निकाल देताना या चौघांना शिक्षेचा निकाल लागल्यापासून पुढील सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचे नमूद केले आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी हा निकाल लागला होता. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांना उभे राहता येणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव