शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

चाळीसगावच्या ‘त्या’ म्हणतात, ‘रडायचं नाही, आता लढायचं...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 01:32 IST

त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे.

ठळक मुद्देमहिला दिन विशेष सुई दोऱ्याने सांधले परिस्थितीला२३ जणी झाल्या कुटुंबाच्या कर्त्या

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव :‘सुई - दोरा, टाका हसरासंघषार्ची वाट हीच खरीध्येय ठेऊनी सरळधाव घ्यावी पैलतिरी...’त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे. मिळून २३ महिलांनी आपल्या फाटक्या परिस्थितीला सांधलेय. आपल्या कुटुंंबासाठी त्या ‘सुखाचा धागा’ झाल्या आहेत. त्यांचा उंच झोका महिला दिनी म्हणूनच आदर्श ठरतो.२०१७ मध्ये तीन वर्षांपूर्वी महिला उद्योगिनी उपक्रमाचे चाक फिरले. हाती होते फक्त सुई-दोरा आणि पायाखाली शिलाई मशिनचे पायडल. मात्र तीन वर्षात या महिलांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद भरलीय. त्या आता कुटुंंबाच्या 'कर्त्या' झाल्या आहेत. प्रत्येकीलाच वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला आहे. तथापि, संकटांच्या छातीवर दमदारपणे पाय रोवून त्यांनी 'नई उडान' घेतली आहे. कुटुंंबातील मुलांचे शिक्षण असो की वयोवृद्धांचे आजार यांना 'ती'च्या कमाईचा आधार मिळालाय. २३ कुटुंंबे पुन्हा नव्याने उभी राहिली आहेत. आनंदून गेली आहे.फिरत्या चाकावरती मिळे कापडाला आकारचाळीसगाव शहरातील भडगाव रोडलगतच्या कैलास नगरातील गजानन कंस्ट्रक्शनमध्ये उद्योगिनी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. उद्योगिनीमध्ये दाखल होण्यासाठी 'गरजू' ही मुख्य अट आहे. महिलांना एक महिना मोफत प्रशिक्षण देऊन शिलाई मशिनवरील कामे दिली जातात. प्रशिक्षणाच्या काळातही तीन हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाते. यानंतर दिवसभरात शिवण कामानुसार मोबदला दिला जातो. सध्या उद्योगिनी प्रकल्पात काम करणाºया बहुतांशी महिला विधवा, परितक्त्या, कौटुंबिक समस्यांना झुंज देणाºया आहेत. उद्योगिनी प्रकल्पात महिलांना स्वावलंबी बनविले जाते. त्यांना शिवण कामाची कामे देऊन मोबदला दिला जातो. सकाळी १० ते सायंकाळी सहापर्र्यंत त्या कामे करतात.मदत नको, कामे द्या!आत्मविश्वासाने परिस्थितीला हरवत २३ महिलांनी आपल्या सैरभैर झालेल्या कुटुंंबाला सावरले आहे. काहींनी पतीच्या निधनानंतर थेट परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. काहींनी आपले दु:ख उगाळत बसण्याऐवजी सुखाचे पदर विणले आहेत. मुलांची थांबलेली शिक्षण वारी सरू करून काहींनी 'हम लढेंगे' हाच मत्र दिला आहे. काहींनी उपवर मुला - मुलींची लग्ने लावून आपले कर्तेपण सिद्ध केले. आम्हाला मदत नको तर हातांना कामे द्या, असं या महिला आवर्जुन सांगतात. उद्योगिनी झालेल्या महिलांच्या मुलांचा गुणगौरव सभारंभ, वाढदिवस, दरदिवशी प्रार्थना. त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक असे पुढे सरकते. शिलाई मशिनचे चाक फिरत असते आणि उद्योगिनीनींचे आयुष्य पुढे सरकत असते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनChalisgaonचाळीसगाव