शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पंधरा दिवसात १२ तरुण-तरुणी रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ते १५ सप्टेंबरदरम्यान बारा तरुण-तरुणी पळून गेल्याने पालकवर्ग चिंतेत पडला आहे.

तालुक्यातील पिंपळे येथून २८ वर्षीय भूषण देवीदास पाटील १४ रोजी सकाळी, तर २० वर्षीय तरुणी १३ रोजी दुपारी दीड वाजता घरातून निघून गेले आहेत. तालुक्यातील निमझरी येथील २३ वर्षीय तरुणी १४ रोजी घरातून निघून गेली. ढेकू रोडवरील देशमुखनगरमधील तरुणी १३ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास निघून गेली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी येथील २३ वर्षीय तरुण पवन कैलास पाटील ९ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर बसस्थानकावरून बेपत्ता झाला आहे. शारदा कॉलनीतील २२ वर्षीय विवाहिता २ रोजी घरातून निघून गेली, तर शनिपेठ, पैलाड येथील २३ वर्षीय तरुणी १ रोजी रात्री घरातून निघून गेली आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील आणखी पाच तरुण-तरुणी घरातून बेपत्ता झाल्याचे समजते; परंतु पालकांनी पोलिसात खबर देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातील काही तरुण-तरुणी विवाह करून परतले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसदेखील तीन ते चार तरुण-तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यात महिनाभरात १२ तरुण-तरुणी पळाले होते; मात्र या महिन्यात ती संख्या २०च्या आसपास झाली आहे. पालकांची चिंता वाढली आहे.

गेल्या महिन्यात तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटनाही घडली होती. अल्पवयीन मुलांना पळून गेेल्याबद्दल शिक्षाही करता येत नाही त्यामुळे गुन्हा घडूनही कायद्यामुळे अधिकारी हतबल होतात. दिवसेंदिवस कौटुंबिक समस्याही सामाजिक समस्या बनत चालली आहे. संस्कार आणि मूल्यांचा ऱ्हास झाल्याने, शाळेतील शिस्तीला कायद्याने आडकाठी केल्याने शिक्षकांचे हात बांधले गेले आहेत, तर सोशल मीडियावरील चित्रफिती व चित्रांना बंदी नसल्याने तरुणाई वाईट मार्गाकडे आकर्षित होत आहे.