शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पंधरा दिवसात १२ तरुण-तरुणी रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ते १५ सप्टेंबरदरम्यान बारा तरुण-तरुणी पळून गेल्याने पालकवर्ग चिंतेत पडला आहे.

तालुक्यातील पिंपळे येथून २८ वर्षीय भूषण देवीदास पाटील १४ रोजी सकाळी, तर २० वर्षीय तरुणी १३ रोजी दुपारी दीड वाजता घरातून निघून गेले आहेत. तालुक्यातील निमझरी येथील २३ वर्षीय तरुणी १४ रोजी घरातून निघून गेली. ढेकू रोडवरील देशमुखनगरमधील तरुणी १३ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास निघून गेली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी येथील २३ वर्षीय तरुण पवन कैलास पाटील ९ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर बसस्थानकावरून बेपत्ता झाला आहे. शारदा कॉलनीतील २२ वर्षीय विवाहिता २ रोजी घरातून निघून गेली, तर शनिपेठ, पैलाड येथील २३ वर्षीय तरुणी १ रोजी रात्री घरातून निघून गेली आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील आणखी पाच तरुण-तरुणी घरातून बेपत्ता झाल्याचे समजते; परंतु पालकांनी पोलिसात खबर देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातील काही तरुण-तरुणी विवाह करून परतले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसदेखील तीन ते चार तरुण-तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यात महिनाभरात १२ तरुण-तरुणी पळाले होते; मात्र या महिन्यात ती संख्या २०च्या आसपास झाली आहे. पालकांची चिंता वाढली आहे.

गेल्या महिन्यात तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटनाही घडली होती. अल्पवयीन मुलांना पळून गेेल्याबद्दल शिक्षाही करता येत नाही त्यामुळे गुन्हा घडूनही कायद्यामुळे अधिकारी हतबल होतात. दिवसेंदिवस कौटुंबिक समस्याही सामाजिक समस्या बनत चालली आहे. संस्कार आणि मूल्यांचा ऱ्हास झाल्याने, शाळेतील शिस्तीला कायद्याने आडकाठी केल्याने शिक्षकांचे हात बांधले गेले आहेत, तर सोशल मीडियावरील चित्रफिती व चित्रांना बंदी नसल्याने तरुणाई वाईट मार्गाकडे आकर्षित होत आहे.