शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

पंधरा दिवसात १२ तरुण-तरुणी रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ते १५ सप्टेंबरदरम्यान बारा तरुण-तरुणी पळून गेल्याने पालकवर्ग चिंतेत पडला आहे.

तालुक्यातील पिंपळे येथून २८ वर्षीय भूषण देवीदास पाटील १४ रोजी सकाळी, तर २० वर्षीय तरुणी १३ रोजी दुपारी दीड वाजता घरातून निघून गेले आहेत. तालुक्यातील निमझरी येथील २३ वर्षीय तरुणी १४ रोजी घरातून निघून गेली. ढेकू रोडवरील देशमुखनगरमधील तरुणी १३ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास निघून गेली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी येथील २३ वर्षीय तरुण पवन कैलास पाटील ९ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर बसस्थानकावरून बेपत्ता झाला आहे. शारदा कॉलनीतील २२ वर्षीय विवाहिता २ रोजी घरातून निघून गेली, तर शनिपेठ, पैलाड येथील २३ वर्षीय तरुणी १ रोजी रात्री घरातून निघून गेली आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील आणखी पाच तरुण-तरुणी घरातून बेपत्ता झाल्याचे समजते; परंतु पालकांनी पोलिसात खबर देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातील काही तरुण-तरुणी विवाह करून परतले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसदेखील तीन ते चार तरुण-तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यात महिनाभरात १२ तरुण-तरुणी पळाले होते; मात्र या महिन्यात ती संख्या २०च्या आसपास झाली आहे. पालकांची चिंता वाढली आहे.

गेल्या महिन्यात तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटनाही घडली होती. अल्पवयीन मुलांना पळून गेेल्याबद्दल शिक्षाही करता येत नाही त्यामुळे गुन्हा घडूनही कायद्यामुळे अधिकारी हतबल होतात. दिवसेंदिवस कौटुंबिक समस्याही सामाजिक समस्या बनत चालली आहे. संस्कार आणि मूल्यांचा ऱ्हास झाल्याने, शाळेतील शिस्तीला कायद्याने आडकाठी केल्याने शिक्षकांचे हात बांधले गेले आहेत, तर सोशल मीडियावरील चित्रफिती व चित्रांना बंदी नसल्याने तरुणाई वाईट मार्गाकडे आकर्षित होत आहे.