शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर रमेशदादा जैन यांच्या कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 21:16 IST

महत्वाची कागदपत्रे जळून खाक : तब्बल दीड ते दोन तास आग ; दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण

जळगाव : उद्योजक, माजी महापौर आणि खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन यांच्या खान्देश मिल कॉम्पलेक्स येथील कार्यालयाला आग लागून महत्वाची कागदपत्रे तसेच संगणक व ए.सी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याचे रमेशदादा जैन यांनी 'लोकमत'ला सांगितले. तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरातील खान्देश मिल कॉम्पलेक्समध्ये माजी महापौर रमेशदादा जैन यांचे कार्यालय आहे. दररोज शिपाई समाधान (पूर्ण नाव माहिती नाही) हा कार्यालय उघड व बंद करीत असतो. त्याप्रमाणे विजेचे मुख्य स्विचही बंद व सुरू करतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शिपायाने कार्यालय उघडले. विद्युत पुरवठा सुरू करण्‍यासाठी मुख्य स्विच सुरू केले. तेव्हा कार्यालयामधील संगणक कक्षात मोठा आवाज झाला. हे बघण्‍यासाठी शिपाई संगणक कक्षामध्‍ये गेला, तेव्हा त्यास आग लागल्याचे दिसून आले. लागलीच शिपायाने स्विच बंद केला.आणि...बघितले तर काय...आगीने धारण केले रौद्ररूपशिपाई समाधान हा मुख्य स्विच बंद करून पुन्हा संगणक कक्षाकडे आले असता, तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. पाहता-पाहता काही क्षणातचं आगीने रौद्ररूप केले आणि आगीचे मोठ-मोठे लोळ दुरपर्यंत पसरले. शिपायाने लागलीच कार्यालयातील कर्मचा-यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नंतर रमेशदादा यांना देखील आगीची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला.मोटारसायकल स्वाराने घेतली अग्निशमन दलाकडे धावकार्यालयातील फर्निचर व कागदपत्रांमुळे आगीचा भडका उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. पाहता-पाहता आगीच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यातच एका दुचाकीस्वाराने मनपाच्या अग्निशमन दलाकडे धाव धाव घेवून आगीची माहिती दिली. तो पर्यंत काही नागरिकांचा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.दीड ते दोन तासानंतर आगीवर नियंत्रणमाजी महापौरांच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने खान्देश मिल कॉम्पलेक्स काही क्षणातच गाठले. दोन बंबांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करण्‍यात आला. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी अपयश येत होते. अखेर दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात मनपाच्या अग्निशमन दलाला यश आले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे युसूफ पटेल, अश्वजित घरडे, गंगाधर कोळी, राजमल पाटील, सोपान जाधव, देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गिरीष खडके, तेजस जोशी, प्रदीप धनगर, संतोष पाटील, गोकुळ गालफाडे, मदन जराड, नामदेव पोळ, बाळू पोळ यांनी प्रयत्न केले.महत्वाची कागदपत्रे, संगणक, फर्निचर जळून खाकएक ते दीड तास चाललेल्या आगीत कार्यालयातील सर्वात महत्वाचे जळून खाक झाले. त्याचबरोबर संगणक, ए.सी तसेच फर्निचर असेही जळून खाक होवून सुमारे लाखो रूपयांचे नुकसान आगीत झाले. अजून किती लाखांचे नुकसान झाले हे समोर आलेले नाही. दरम्यान, आगीत जी सर्वात महत्वाची कागदपत्रे होती, ती सर्व जळाली असल्याचे रमेशदादा जैन यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव