शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

क्षणीक सुखासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवायचे काम केले, गिरीश महाजनांचा टोला

By ajay.patil | Updated: March 27, 2023 21:06 IST

'राहुल गांधींना तंबी नको, त्यांच्यासोबत युती तोडा...'

जळगाव - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या क्षणीक सुखासाठी शिवसेना संपवण्याचे काम केले असून, उद्धव ठाकरेंना आज त्याची किंमत चुकवावी लागत आहे. आता केवळ तथ्यहीन भाषण करण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. त्यांची भाषणं मी फारसे मनावर घेत नाही असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

भाजपच्या जिल्हा बैठकीनंतर गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यविर सावरकर यांचा अपमान करत आहेत. मात्र, ज्या सावकरांच्या नावावर राजकारण उद्धव ठाकरे करतात, ते मात्र राहुल गांधींना केवळ तंबी देतात. जर सावरकरांबाबत प्रेम असेल तर कॉग्रेससोबत असलेली युती तोडून बाहेर निघा असेही महाजनांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आधीच हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, आता सावरकरांना देखील ते सोडत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. ठाकरेंचे सावरकरांबाबतचे प्रेम हे दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे ठाकरे आता जुनेच मुद्दे मांडत आहेत. त्यांची शिवसेना केवळ नावालाच असून, केवळ उसणे माणसं सभेत आणण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचाही आरोप महाजनांनी केला.

युतीतील जागांबाबत वादविवाद नाही, सर्व निर्णय दिल्लीहून होईलभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा देण्याबाबतचे वक्तव्य केले होते. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, प्रदेशाध्यक्ष आपल्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा यासाठी बोलले होते. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. युतीतील जागांबाबत कोणताही वादविवाद नाही. याबाबतचा सर्व निर्णय हा वरिष्ठ नेतेच घेतील. सर्व निर्णय हे दिल्लीहूनच होतील असेही महाजनांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGirish Mahajanगिरीश महाजन