शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गडकरी यांच्या तंबीनंतर महामार्गाच्या कामाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:22 IST

औरंगाबाद महामार्ग : वाकोदजवळ काँक्रीटीकरण वेगात

वाकोद, ता. जामनेर : जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. अशातच पावसाने पूर्णत: वाट लावल्याने गैरोसोयीचा कळस झाला. याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘दणका’ दिल्यावर या रस्त्याच्या कामास चांगली चालना मिळाली आहे.रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाल्याने या ठिकाणी वेळोवेळी वाहतूक ठप्प होत होती. या रस्त्यावर जागो जागी मोठ मोठे खड्डे पडले असून शनिवार संध्याकाळी वाकोदसह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने वाकोदच्या नाल्याला पुर आल्याने ठेकेदारा कडून बनविण्यात आलेला कच्चा पुल पाण्यात वाहून गेला होता. त्यामुळे वाकोद गावचा संपर्क तूटला होता. दोन्ही बाजुंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. रातोरात युद्धपातळी वर काम करुन या रस्त्याची दुरुस्ती करून रविवार दुपार पर्यत वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. या रस्त्या बाबत वाढत्या तक्रारी पाहता नितीन गडकरी यांनी संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांना आठ दिवसाच्या आत हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची तंबी देताच लागलीच या कामाला गती मिळाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकJalgaonजळगाव