शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

सांडपाण्यामुळे गिरणा, मेहरूण तलाव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:40 IST

बेसुमार वाळू उपसा : शेतीच्या अतिक्रमणामुळे गिरणा लुप्त होण्याचा मार्गावर

जळगाव : एकीकडे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले खळाळून वाहत असताना दुसरीकडे मात्र गिरणेचे पात्र केवळ जळगाव शहराच्या प्रदुषित सांडपाण्यामुळे थोडेफार भरलेले दिसून येत आहे. शहरातील सर्व सांडपाणी गिरणेत जात आहे. गिरणेसह शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या मेहरुण तलावात देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत असल्याने गिरणा व मेहरूणचे अस्तित्व धोक्यात आले आहे.शहरालगत गेलेल्या गिरणा नदीची स्थिती सध्यस्थिती बिकट झाली असून, एकेकाळी नेहमी खळाळणाºया गिरणेला गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात अपवादात्मक स्थितीत पूर आलेला असतो. त्यातच जळगाव शहराचे सर्व सांडपाणी विविध नाल्यांव्दारे गिरणेत सोडले जात असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. जळगाव शहरासह नदीलगत असलेल्या सर्व गावांचे सांडपाणी देखील गिरणा नदीत जात आहे. प्रशासनासह पर्यावरणवादी संघटना असोत वा नदीकाठावर वसलेल्या गावांमधील ग्रामस्थ कोणालाही लुप्त होणाºया गिरणेची आर्त हाक ऐकू येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.नदीत वाळूचा ३ मीटरचा थर असणे आवश्यककोणत्याही नदीत पाणी जमीनीत शोषून घेण्यासाठी व पाण्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नदीत ३ मीटरचा थर कायम ठेवणे गरजेचे आहे. सध्या गिरणा नदीत अनेक ठिकाणी हा थर दिसून येत नसून, पात्रात आता खडक लागायला सुरुवात झाल्याने धोक्याची पातळी गाठली आहे. तसेच नदीवर अनेक ठिकाणी बंधारे, धरणे तयार झाल्यामुळे वाळू तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबली आहे. नवी वाळू तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया खूप मोठी असते, त्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागतो.त्यामुळे सध्या परिस्थितीत होणारा वाळूचा बेसुमार उपसा रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत भुवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले आहे़मेहरुण तलावातही मोठ्या प्रमाणात जलप्रदुषणशहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावातही गिरणेप्रमाणेच आजूबाजुच्या वस्तीतून मोठ्या सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. याबाबत अनेक पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण प्रेमींकडून मनपा प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी करून देखील कुठलीही कार्यवाही मनपाकडून करण्यात आलेली नाही. मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम होत आहे. तसेच अनेक फ्लॅटसह काही घरांचे सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावाचे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. यासह मेहरूण तलाव परिसरात एकेकाळी मोठी वनराई व त्यामुळे विविध प्रकारच्या पशू-पक्ष्यांचा अधिवास होता. मात्र मनपाने या परिसरात होणाºया वृक्षतोडीकडे दूर्लक्ष केल्याने पर्यावरण धोक्यात आले असून येथील जैवविविधताही धोक्यात आली आहे.भूजल पातळीही खालावलीगिरणातील वाळू उपशामुळे भूजल पातळीत घट होत असून, उन्हाळ्यात गिरणा लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. जानेवारी, फेब्रुवारीपासूनच गिरणा पट्ट्यातील शेतांमधील ट्यूबवेल्स आटल्या जातात. सावखेडा ते पळसोद पर्यंत केळीसाठी ओळखला जाणाºया भागातील केळीचे उत्पादन देखील कमी होत जात आहे.बेसुमार वाळू उपसा, नदी पात्रात अतिक्रमीत शेती- गिरणा नदीपात्रातील वाळूला इतर नद्यांचा तुलनेत बांधकामासाठी सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाढणाºया बांधकामासाठी गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून त्यामुळे वाळू संपत येत आहे. सावखेडा शिवारापासून बांभोरी, आव्हाणे, फुपनगरी, नांद्रा,आमोदा ते गाढोदा अशा ४० किमी च्या गिरणा पट्ट्यात दररोज बेसूमार वाळू उपसा सुरु असल्याने नदीचे अस्तित्व संपण्यासारखेच झाले आहे.-नदीपात्रात गावांलगतचा वाळू साठा कमी होत असल्याने माती लागत आहे तर काही ठिकाणी खडक, यामुळे अनेक आव्हाणे, फुपनगरी, बांभोरी, सावखेडा, गाढोदा, कानळदा भागात अनेक शेतकऱ्यांनी थेट नदीपात्रात शेती करायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढत जात आहे. मात्र, महसूल प्रशासन असो वा स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.भुयारी गटार योजनेमुळे जळगावचे सांडपाणी गिरणा नदीत जाणार नाहीजळगाव शहरातील सर्व सांडपाणी हे गिरणा नदीत जाते त्यामुळे गिरणेचे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. तसेच आसपासच्या अनेक कंपन्यांचे पाणी देखील गिरणेतच सोडले जात आहे. जळगाव शहरासाठी अमृत अंतर्गत मंजूर झालेल्या भुयारी गटारीचे काम दोन वर्षात पुर्ण झाल्यानंतर शहरातून जाणारे सर्व सांडपाणी गिरणेत जाण्यापासून रोखले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात गिरणेची काही प्रमाणात जलप्रदुषणापासून मुक्ती होवू शकते. दरम्यान, मृत्यु शय्येवर पडलेल्या गिरणेला वाचविण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव