शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने जळगाव जिल्ह्यात सात दिवसात पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:26 IST

तापमान ४५ अंशांवर

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षदिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ -: दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा बसत आहे. आठ दिवसात पाच बळी गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एरव्ही दरवर्षी मे महिन्यात ४४ अंशावर पारा जातो. यंदा एप्रिलमध्येच ४४ अंशाच्या पुढे पारा गेल्याने जिल्ह्यावासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. २८ एप्रिल रोजी सर्वोच्च ४५ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.२८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यानंतर ३० रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ५ मे रोजी जमनालाल चेताजी रेगर (वय ५५ रा. लेवरिया, ता.राशमी, जि.चितोडगड, राजस्थान ह.मु. राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) या आईसक्रीम व्यावसायिकाचा दुपारी साडे बारा वाजता उष्माघाताने राणीचे बांबरुड येथे मृत्यू झाला.दरम्यान, या पाचही मृत्यूबाबत वैद्यकीय सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नसून शवविच्छेदन अहलावालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईस, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.आठवडाभरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२८ एप्रिल - ४५२९ एप्रिल - ४४.४३० एप्रिल - ४४२ मे - ४२३ मे - ४४४ मे - ४३५ मे - ४२

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव