शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उष्माघाताने जळगाव जिल्ह्यात सात दिवसात पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:26 IST

तापमान ४५ अंशांवर

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षदिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ -: दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा बसत आहे. आठ दिवसात पाच बळी गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एरव्ही दरवर्षी मे महिन्यात ४४ अंशावर पारा जातो. यंदा एप्रिलमध्येच ४४ अंशाच्या पुढे पारा गेल्याने जिल्ह्यावासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. २८ एप्रिल रोजी सर्वोच्च ४५ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.२८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यानंतर ३० रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ५ मे रोजी जमनालाल चेताजी रेगर (वय ५५ रा. लेवरिया, ता.राशमी, जि.चितोडगड, राजस्थान ह.मु. राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) या आईसक्रीम व्यावसायिकाचा दुपारी साडे बारा वाजता उष्माघाताने राणीचे बांबरुड येथे मृत्यू झाला.दरम्यान, या पाचही मृत्यूबाबत वैद्यकीय सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नसून शवविच्छेदन अहलावालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईस, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.आठवडाभरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२८ एप्रिल - ४५२९ एप्रिल - ४४.४३० एप्रिल - ४४२ मे - ४२३ मे - ४४४ मे - ४३५ मे - ४२

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव