शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वडोदा वनक्षेत्रात पाच बिबटे, मानवी हल्ले मात्र अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:28 IST

मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत.

ठळक मुद्देमानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वडोदा वनविभागाचे प्रयत्नवन्यजीव प्राणी हा जंगलांचा व निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक

विनायक वाडेकरमुक्ताईनगर : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वडोदा वनविभागांतर्गत बिबट्यांची संख्या असली तरी मानव व वन्यजीव प्राण्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे करण्यात येणारे प्रयत्न त्यांचे मानवी हल्ल्यावरचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास यशस्वी ठरले आहेत.वनविभागाचा जनजागृतीवर भरवडोदा वनक्षेत्र हे महाराष्ट्रातील पट्टेदार वाघांचे वास्तव्य असलेले सुप्रसिद्ध असे जंगल आहे. १४ हजार हेक्टर विस्तीर्ण अशा वनजमिनीवर पसरलेल्या या रानात बिबट्यांची संख्या तब्बल पाच आहे. वाघांचे वास्तव्य असलं तरी कोºहाळा, भोटा, सुळे, रिगाव या नदीकाठच्या गावांमध्ये त्याचे वास्तव्य दिसून येत आहे. वाघाचे वास्तव्य असल्याने बिबट्याचा वावर हा कमीच आहे. मात्र तरीदेखील मानवी वस्तीत येऊन मानवी हल्ले होऊ नयेत यासाठी वनविभागाने जनजागृती अभियान राबवले आहे. वनाचे महत्त्व, त्यासोबतच वन्यजीव प्राण्यांचे जंगलांच्या वास्तव्यासाठी असलेले महत्त्व हे जनतेला पटवून देण्यासाठी विविध प्रसंगी जनजागृती अभियान राबवले जाते. एवढेच नव्हे तर अतिशय जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये वेळोवेळी सतर्कतेचे इशारे देत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभाग तत्पर असते. माणसांनी जंगलात जाऊ नये म्हणून गॅस वाटप करण्यात आले. अत्यल्प दरात रहिवाशांना गॅस मिळत असल्याने जळाऊ लाकडांचा उपयोग इंधन म्हणून कमी झाल्याचे जाणवत आह.ेया जनजागृतीमुळे काही बोटावर मोजण्याइतके प्रकार वगळता मानव आणि वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष दूर ठेवण्यास आतापर्यंत वनविभागाला यश आले आहे.आतापर्यंत बिबट्यांच्या मानवी हल्ल्याच्या केवळ चार ते पाच घटनाबिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत मयत व्यक्ती झाल्याच्या घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनविभागाच्या अंतर्गत तरी घडल्याचे दिसून येत नाही. चार ते पाच हल्ले बिबट्याने आतापर्यंत भोटा, कोºहाळा, सुळे आणि रिगाव या वनविभागाच्या परिसरात केलेल्या असल्या तरी त्यात कोणी दगावले नाही. भोटा शिवारात नुकतेच वासरूवर हल्ला करून ठार करण्याची घटना घडली होती. एवढेच नव्हे तर बकरीदेखील फस्त करण्यात बिबट्याला यश आले आहे. परंतु मानवी हल्ल्याच्या घटना घडलेल्या नाही.वन्यजीव प्राणी गावात येण्यासाठी उभारल्या उपाययोजनावन्यजीव प्राणी आणि मानवजातीतील संघर्ष हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. मात्र वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत अतिशय शिस्तबद्धरित्या संरक्षण योजना या राबवल्या जात असल्याने प्राणी जंगलातून गावाकडे येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणी कमी झाल्यानंतर बिबट्या किंवा इतर तृणभक्षी प्राणी हे जंगलातून गावाकडे धाव घेत असतात. मात्र वनविभागाअंतर्गत उन्हाळ्यात पाणवठे, मातीचे बंधारे व सिमेंट बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. जेणेकरून वन्यजीव प्राणी हे जंगल सोडून बाहेर येत नाही. वडोदा वनविभागाच्या अंतर्गत १६ पाणवठे, २० वनबंधारे व जवळपास १० सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. प्राण्यांना मानवी वस्तीकडे वळण्यासाठी मज्जाव करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. एवढेच नव्हे तर चारठाणा भवानी संवर्धन क्षेत्र अंतर्गत पाच कोटी रुपये योजनेची गवत लागवड ही योजना गेल्या चार वर्षांपासून राबवली जात आहे. त्यासाठी निधी उपलब्ध नसला तरी गेल्या चार वर्षांपूर्वी गवत लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे तृणभक्षी प्राणी हे महसुली विभागात न जाता चारठाणा जंगलातच राहतात व त्यावरच मांसभक्षक प्राणीदेखील जीवन जगत असल्याने प्राण्यांचा गावाकडे येण्याचा ओढा हा क्वचित आहे.नियमित गस्त व मेंढपाळ, स्थानिक रहिवाशी यांच्यामध्ये असलेला समन्वय यातून बºयापैकी वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण केले जात आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी शिकारीसाठी आलेले बºहाणपूर भागातील काही शिकारीदेखील वन वभागाने पकडले होते.वडोदा वनविभागात वन्यजीव प्राणी व वने यांचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे मानव व वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यास आम्हाला यश आले आहे. वन्यजीव प्राणी हा जंगलांचा व निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वांनी त्यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले पाहिजे.-अमोल चव्हाण, वनक्षेत्रपाल, वडोदा 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर