शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहातच आत्महत्या, ‘बॅकलॉग’साठी सुरू होती परीक्षा

By विजय.सैतवाल | Updated: February 27, 2024 00:00 IST

काही दिवसांपासून होता तणावात

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मूळ बीड येथील रहिवासी असलेला विश्वंभर खडके हा विद्यार्थी ‘जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तो मित्रांसह गेला होता. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला. 

संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा 'रुममेट' शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत  खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्र्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात लोटला असता कडी उघडली व त्याला विश्वंभरने गळफास घेतल्याचे दिसले. ते दृष्य पाहताच शिवमसिंह खाली गेला व इतर विद्यार्थ्यांसह त्याने ती माहिती रेक्टरला दिली. त्यानंतर  एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले.  नंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

दोन ते तीन दिवसांपासून तणावात

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्वंभर तणावात होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. सोमवारी दुपारी कार्यक्रम सुरू असताना त्याला दोन ते तीन वेळा मोबाईलवर कॉल आले. त्यावेळी तो उठून बाहेर बोलायला जात होता.

४:४१ वाजता मित्राशी शेवटचे बोलणे

कार्यक्रमाच्या ठिकाणाहून विश्वंभर निघून गेल्यानंतर शिवमसिंहने त्याला कॉल केला. दुपारी ४:४१ वाजता त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले, असे शिवमसिंहने सांगितले. दुपारी ३:३० वाजता विश्वंभर हा कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेला त्यावेळी त्याला खूप घाम आलेला होता, असेही त्याने सांगितले. शिवमसिंह खोलीवर गेल्यावर दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने मनात भीती निर्माण झाली होती व दरवाजा उघडताच भयावह दृष्य दिसल्याचे शिवमसिंहने सांगितले.

‘बॅकलॉग’विषयी घरी सांगितले नाही!

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये विश्वंभर दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला होता. त्यापैकी एका विषयाची परीक्षा २२ फेब्रुवारीला झाली होती, तर २९ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या विषयाची परीक्षा होती; मात्र त्यापूर्वीच विश्वंभरने टोकाचा निर्णय घेतला. 'बॅकलॉग'विषयी त्याने घरी सांगितलेले नव्हते. परीक्षा झाल्यानंतर विषय निघाले अथवा राहिले तरी त्याविषयी घरी सांगणार असल्याचे त्याने त्याचा मित्र शिवमसिंहला सांगितले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव