शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

जळगाव : महात्मा गांधी यांनी देशासाठी कसा निधी उभारला. यावर जळगावातील गांधी रिसर्च फाउंडेशनमधील डाॅ.अश्विन झाला व निर्मला झाला ...

जळगाव : महात्मा गांधी यांनी देशासाठी कसा निधी उभारला. यावर जळगावातील गांधी रिसर्च फाउंडेशनमधील डाॅ.अश्विन झाला व निर्मला झाला यांनी संशोधन करीत पीएचडी मिळविली आहे.

अश्विन झाला हे २०१० मध्ये जळगावला आले. त्यावेळी जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.भवरलाल जैन यांनी झाला दाम्पत्याला या विषयावर पीएचडी करण्यास सांगितले. त्यानुसार झाला दाम्पत्याने अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. हे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात सादर करीत त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.

अश्विन झाला हे भावनगरच्या एमएसडब्लू महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी संशोधनासाठी जळगावला आल्या होत्या. सध्या हे दाम्पत्य याठिकाणी रिसर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे, तर निर्मल झाला याठिकाणी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे.

या संशोधनात महात्मा गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले यावर संशोधन केले आहे. निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असता. बऱ्याचदा ते आपल्याला मिळालेल्या काही वस्तूंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा ज्या वस्तूंची त्यांना गरजच नाही अशा वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाउंडाचा निधी उभारला आणि कोलकाता येथे भारताच्या व्हाइसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी आयुष्यभरात जवळपास ३०० वेळा निधी संकलित केला. त्यातील १०० वेळा निधी संकलित केल्याची यादी तयार केली आहे. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला केल्याचे सांगितले.

प्रबंधाचे पुस्तक रूपात होणार प्रकाशन

अश्विन झाला यांनी ‘गांधी यांनी एकत्र केलेल्या निधीची पद्धत आणि शैली माध्यम, हिशोब कसा ठेवला आणि कसा प्रयोग केला यावर पीएचडी केली आहे, तर त्यांच्या पत्नी निर्मला यांनी गांधीजी आणि महाराष्ट्र यावर पीएचडी केली आहे. त्यांनी गुजरात विद्यापीठातून प्रबंध सादर केले. त्यांना डॉ. सुदर्शन अय्यंगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रबंधांचे पुस्तक स्वरूपात प्रकाशनदेखील होणार आहे. त्याचे मराठीसह चार भाषांमध्ये भाषांतर केले जाणार आहे.