शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षानंतर प्रथमच वाढला निकालाचा टक्का यंदा १६.५९ टक्क्यांनी वाढ, पुन्हा मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:15 IST

दहावी निकाल : जिल्ह्यातील १९ हजार विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, भुगोलात मिळाले सरासरी गुण

जळगाव : दहावी परीक्षेचा निकाल जिल्ह्याचा टक्का तब्बल १६़५९ ने वाढला आहे. दहावीच्या निकालाचा आलेख गेल्या ४ वर्षानंतर प्रथमच उच्चांकावर पोहचला आहे. बग़ो़शानभाग विद्यालयाची समीक्षा विजय लुल्हे ही विद्यार्थिनी ९९़८० टक्के मिळवून जिल्ह्यात अव्वल ठरली तर नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयातील महेश्वरी दीपक नारखेडे हिला ९९़६० टक्के मिळाले आहेत.

यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या स्थानी राहिला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल ७६़९२ टक्के इतका तर यंदा ९३.५१ टक्के निकाल लागला आहे.दहावीचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ५९ हजार ७१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात ३३ हजार ७५१ मुले तर २५ हजार ३२० मुली होत्या. त्यापैकी ५५ हजार २४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३१ हजार ८४ मुले तर २४ हजार १५६ मुली आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२़१० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५़४० इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी ३़३० ने अधिक असून, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यात १३४ परीक्षा केंद्र होती.शानभागची हॅट्ट्रीकदहावी निकालात शानभाग विद्यालयाची ‘हॅट्ट्रीक’ झाली असून २०१८ मध्ये विशाखा कुलकर्णी या विद्यार्थिनीनंतर २०१९ मध्ये प्रज्ज्वल पाटील आणि आता समीक्षा लुल्हे ही ९९़८० टक्के मिळवून अव्वल ठरली आहे़२१ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्णजिल्ह्यातून यावर्षी १९ हजार २७० विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, २१ हजार २५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार २२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ हजार ४९५ विद्यार्थी हे पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोल विषयाचे मिळालेले सरासरी गुण या प्रमुख कारणांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.२१ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्णजिल्ह्यातून यावर्षी १९ हजार २७० विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, २१ हजार २५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार २२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ हजार ४९५ विद्यार्थी हे पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोल विषयाचे मिळालेले सरासरी गुण या प्रमुख कारणांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.कॉपी प्रकरणात घटजळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी तब्बल १४८ कॉपीबहादरांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यंदा कॉपी प्रकरणात घट होवून फक्त ३८ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांवर झाली आहे.गुण पडताळणीसाठी ८ आॅगष्टपर्यंत मुदतदहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपळताळणीसाठी ३० जुुलैपासून ८ आॅगष्टपर्यंत मुदत देण्यात आली असून छायाप्रतीसाठी देखील १८ आॅगष्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव