शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

धक्कातंत्राने गाजला निवडणुकीचा पहिला टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:44 IST

एकनाथराव खडसे यांच्यासोबतच गटातील उदेसिंग पाडवी, अनिल गोटे, दिलीप कांबळे यांचीही तिकीटे भाजपने कापली, खान्देशातील यादीवर गिरीश महाजन यांचा वरचष्मा ; धुळ्याची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा राजकीय पक्षांनी वापरलेल्या धक्कातंत्राने गाजला. पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांच्याविरुध्द चार वर्षे जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या एकनाथराव खडसे यांना शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतीक्षा करायला लावून तिकीट कापण्यात आले. कन्येला तिकीट दिल्याचे समाधान असताना खडसे गटाचे म्हणून समजल्या जाणाºया उदेसिंग पाडवी, दिलीप कांबळे आणि अनिल गोटे या आमदारांचीही तिकीटे कापली. संजय सावकारे मात्र बचावले. खडसे यांनी पक्षादेश मान्य केल्याने संभाव्य वादळ शांत झाले.यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वेगळेपण प्रत्येक टप्प्यावर जाणवू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाने जागावाटप जाहीर केलेले नाही. युती आणि आघाडी असल्याने कोणत्या जागा कोण लढवणार हे जागावाटपाने कळते. रणनीती म्हणून हा निर्णय झाला की, पक्षांमध्ये संभ्रम, गोंधळाचे वातावरण होते हे कळायला मार्ग नाही. पण उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यावर जागावाटप कळले. उमेदवारांच्या यादीवरुन जागांचा आढावा घेतला तर खान्देशातील २० जागांपैकी भाजप १४ तर शिवसेना ६, काँग्रेस ८ तर राष्टÑवादी १० आणि भुसावळची जागा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपाला गेली आहे. धुळ्याची जागा आघाडीपैकी कोणताही पक्ष अधिकृत चिन्हावर लढवत नाही.सर्व जागांवर उमेदवार देण्याचे दावे, स्वबळ अजमावण्याचा निर्धार, पक्षसंघटन मजबूत असल्याचे म्हणणे यात किती तथ्य होते, हे या पहिल्या टप्प्यात दिसून आले.राजकीय पक्षांच्या अपरिहार्य धक्कातंत्राचा हा भाग म्हणावा लागेल. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये बंडखोरीचे प्रमाण मोठे आहे. ही बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान, ज्यांचा उमेदवार यादीवर वरचष्मा आहे, त्या गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यापुढे आहे.एकनाथराव खडसे आणि भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यातील बुध्दिबळाचा डाव तीन दिवस चांगलाच रंगला. खडसे यांना तिकीट नाही, ही कुजबूज गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होती. अशीच कुजबूज लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी होती, पण ती फोल ठरली. तसेच विधानसभा निवडणुकीत घडेल, असा खडसे समर्थकांचा होरा होता. स्वत: खडसे यांनीच रोहिणी नव्हे, मीच पक्षाचा उमेदवार असे जाहीर करुन उमेदवारीवर दावा ठोकला होता. अधिकृत यादी जाहीर होण्यापूर्वी ‘मुहूर्ता’ची ढाल पुढे करुन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षापुढे पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजप आता वाजपेयी-अडवाणी यांच्या काळातील राहिलेला नाही, मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने तीन याद्या जाहीर करुन खडसेंना प्रतिक्षेवर ठेवले. ‘तुम्हाला तिकीट नाही, तुम्ही सूचवाल त्याला देऊ’असे त्यांनाच जाहीर करावे लागले. शेवटच्या दिवशी कन्या रोहिणीचे तिकीट जाहीर झाले. पक्षाने केवळ त्यांचेच तिकीट न कापता समर्थक असलेल्या उदेसिंग पाडवी, (शहादा), माजी मंत्री दिलीप कांबळे (पुणे), अनिल गोटे (धुळे) यांचीही तिकीटे कापून मोठा धक्का दिला. पक्षाच्या भूमिकेची कल्पना आल्याने खडसे यांनीही नमते घेत कन्येची उमेदवारी स्विकारली. अपक्ष किंवा राष्टÑवादी हे पर्याय असूनही त्यांनी ते नाकारले. भाजपमधील वाद तूर्तात शमले, असे म्हणावे लागेल.धुळे शहर मतदारसंघात भाजपकडे अनेक मातब्बर इच्छुक असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक म्हणावा लागेल. आघाडीत जळगाव आणि भुसावळ जागांविषयी निर्णय चकीत करणारा आहे. अर्थात पडद्याआड काय घडले आहे, हे काही काळानंतर बाहेर येईल. पण आता तरी या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे. सोमवारी माघारीची मुदत संपल्यानंतरच खºया अर्थाने सर्व २० मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. तेथील लढती निश्चित होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव