शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

अमळनेर तालुक्यात दुष्काळाची पहिली कळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST

अमळनेर : जुलै महिना अर्धा उलटला तरी पावसाने अजून समाधानकारक आगमन केलेले नाही. अपेक्षित पावसाच्या निम्म्यापेक्षा कमी ५१.३ ...

अमळनेर : जुलै महिना अर्धा उलटला तरी पावसाने अजून समाधानकारक आगमन केलेले नाही. अपेक्षित पावसाच्या निम्म्यापेक्षा कमी ५१.३ मि.मी. पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत, तर अनेकांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आल्याने दुष्काळ सदृश परिस्थितीवर उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

अमळनेर तालुक्यात जानेवारी ते डिसेंबरअखेर सरासरी पर्जन्यमान ६७०.७१ मि.मी. असून जून ते सप्टेंबर खरीप हंगामातील जून महिन्यात ११४.८३मि.मी. तर जुलै महिन्यात १८५.६१ मि.मी. असा एकूण ३००.४४ मि.मी. अपेक्षित असताना १० जूनपर्यंत फक्त ४१.५० मि.मी. तर १२ जुलैअखेर फक्त ९.५३ मि.मी. पाऊस पडला आहे. म्हणजे फक्त ५१.०३ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरित परिणाम झाले आहेत. दुष्काळाची प्रथम कळ निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही उपयोग झालेला नाही. काही ठिकाणी बियाण्याचे कोंब येऊन पाणीच नसल्याने कोमेजले आहे. पीक हातचे गेले आहे. उडीद, मूग या पिकांचा उत्पन्न येण्याचा कालावधी संपल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीऐवजी शेती रिकामी ठेवली आहे. अनेक ठिकाणी शेतीला अद्यापही तडे पडलेले दिसत आहेत. ७२ तासात बियाणे न उगवल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळतो. मात्र अजून बँकांनी विमा हप्ता कंपन्यांना न भरल्याने तेही लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

बियाणे, खते मजुरीचा पैसा वाया गेला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज देण्यास अजूनही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन त्यांच्यापुढे आत्महत्याशिवाय पर्याय नाही.

तरी महसूलमंत्र्यांनी दुष्काळाच्या पहिल्या टप्प्यातच काहीतरी उपाययोजना करून संबंधित विभागाना योग्य त्या कारवाईच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.