शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पहिल्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावल्या पाच गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 18:03 IST

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली होती. तब्बल ७०व्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पाच गाड्या लावल्या.

ठळक मुद्देवर्दळ कमीसुरक्षितेसाठी उपाययोजना

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली होती. तब्बल ७०व्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पाच गाड्या लावल्या. लॉकडाऊन-५ मध्ये कोरोनासोबत जनजीवन पूर्वपदावर आणण्याकरिता रेल शासनाने नियमात शिथिलता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी गाड्याही हळूहळू सोडण्यात येत आहे. भुसावळ विभागातून १ जूनला डाऊन दिशेने पाच गाड्या धावल्या.गाडी क्रमांक १०९३ महानगरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०९०४५ ताप्ती गंगा एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०२७१५ सचखंड एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०६१ पवन एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०७१ कामायनी एक्सप्रेस या पाच गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावल्या.श्रमिक गाल्या सोडल्या तर ७० दिवसानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावरून पूर्वीच्या नियमित गाड्या हळूहळू सोडण्यात येत आहे.सुरक्षितेसाठी उपाययोजनारेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवास्याचे तिकीट कन्फर्म असेल तरच आतमध्ये प्रवेश देण्यात येत असून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटाईज केल्यानंतर रेल्वेस्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावर असलेल्या प्लाझा स्टॉलवरील फूड पाकीट पॅकिंगमध्ये देण्यात येत आहे. उघडे फूट पॅकेट बंद करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या सामानालाही सॅनिटाईज करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क वापर करण्यावरही भर देण्यात येत आहे.वर्दळ कमीएरवी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ दिसून येते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच गाड्यांना भुसावळ रेल्वे स्थानकावरून परवानगी मिळाल्याने प्रवाशांची पाहिजे त्या प्रमाणात रेलचेल दिसून आले नाही. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ